Breaking

Nagpur BJP : नवीन पिढीपर्यंत आणीबाणीची दाहकता आणण्यावर भर

BJP alleges that Sanjay Gandhi created panic during Emergency : भाजपचा निर्धार; संजय गांधींनी आणीबाणीदरम्यान निर्माण केली दहशत

Nagpur काँग्रेसचे नेते आज संविधान बचावची भाषा करतात. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसनेच आणीबाणीच्या काळात संविधानाची गळचेपी करण्याचे काम केले होते. नवीन पिढीपर्यंत काँग्रेसचा हा खरा चेहरा व आणीबाणीची दाहकता आणण्यावर आमचा भर असेल, असा निर्धार भाजपचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

आणीबाणी लागू होऊन ५० वर्ष होत असल्याने भाजपकडून देशभरात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने कॉंग्रेसवर भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजप नेत्यांनी इंदिरा गांधी यांचे दिवंगत पुत्र संजय गांधी यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले आहे. आणीबाणीच्या कालावधीत संजय गांधी व त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांनी देशात दहशत निर्माण करून मनमानीचा कारभार केल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास व नागपुरचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी लावला.

Anti-Drug Awareness Week : ऑपरेशन थंडरअंतर्गत ७३० अटकेत, तर आठ कोटींचे अंमली पदार्थ जप्त !

शुक्रवारी नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. १९७५ मध्ये देशात लादलेल्या आणीबाणीला २५ जून रोजी ५० वर्षे पूर्ण होतील. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या हजारो लोकांना तुरुंगात टाकले होते, ज्यात विरोधी पक्षाचे नेतेही होते. आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय म्हणून ओळखली जाते. यात संजय गांधी यांची मोठी भूमिका होती. त्यांनी जबरदस्तीने देशातील अनेक अविवाहित तरुणांचीदेखील नसबंदी केली होती.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पाणीपुरवठ्याची ऐशीतैशी!

भाजपकडून २५ जून रोजी आणीबाणीच्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. यात आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या मिसाबंदींचा सन्मान केला जाईल. हा सन्मान केवळ औपचारिकता नाही, तर त्यांच्या संघर्ष आणि बलिदानाची स्मृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले.