Irregularities in PM awas yojna: कामातील गंभीर त्रुटींवर ठेवले बोट; प्रकल्पाला अचानक दिली भेट
Amravati गरीब व गरजूंसाठी परवडणाऱ्या घरांचा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाच्या अमरावतीतील अंमलबजावणीत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. खासदार बळवंतराव वानखडे यांनी या प्रकल्पाची अचानक पाहणी केल्यानंतर निकृष्ट दर्जाचे काम, नियमांचे उल्लंघन आणि संभाव्य गैरव्यवहार याची शक्यता व्यक्त केली आहे.
या पाहणीस माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, रामेश्वर अभ्यंकर, संजू थोरात, संजय महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. प्रकल्पाच्या पाहणीत घरांचे बांधकाम अर्धवट, ठरलेल्या निकषांनुसार काम न होणे, तसेच निकृष्ट साहित्याचा वापर यामुळे लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी आहे.
CM Devendra Fadnavis : अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी विशेष बैठक
पाहणीदरम्यान लाभार्थ्यांनी थेट खासदारांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. अनेक घरांचे बांधकाम अपूर्ण असून, काही ठिकाणी केवळ ढाचा उभा करण्यात आला आहे. काही ठिकाणी भिंतींना तडे गेलेले आहेत तर मजले अपूर्ण स्थितीत आहेत. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खासदार वानखडे यांनी याप्रकरणी तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता यावी, लाभार्थ्यांना दर्जेदार घरे मिळावीत यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अंमलबजावणीत पारदर्शकतेचा अभाव
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गृहनिर्माण हे गरिबांसाठी आशेचा किरण मानले जाते. मात्र अमरावतीतील सद्यस्थिती पाहता या योजनेचा हेतूच भरकटल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थ्यांचे स्वप्न भंगले असून, ही योजना केवळ कागदावरच यशस्वी असल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
Arvind Jagtap : पक्ष फोडायचा अन आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच शिकायचं…!
तातडीने हस्तक्षेपाची गरज
खासदार वानखडे यांच्या पाहणीमुळे अमरावतीतील प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. शासनाने याप्रकरणी तातडीने लक्ष घालून दोषींना जाब विचारावा, अशी अपेक्षा आता जनतेतून व्यक्त होत आहे.