Tara Bhawalkar objects to the government’s cleverness : सरकारच्या चतुरपणावर तारा भवाळकर यांचा आक्षेप
Mumbai : सरकारने मोठ्या चतुरपणाने त्रीभाषिक अशी भाषा वापरली आहे, त्यांनी हिंदी भाषा सक्तीची असे कुठेही म्हटले नाही. त्रीभाषा सूत्र असे म्हणत मेखा मारली आहे. असा जोरदार टोला ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी सरकारला लगावला आहे. पहिली पासून तिसरी भाषा म्हणून हिंदीच्या सक्तीविरोधात राज्यात वातावरण तापलं आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी मागणी होत आहे.
सरकारने मोठ्या चतुरपणाने त्रीभाषिक अशी भाषा वापरली आहे, त्यांनी हिंदी भाषा सक्तीची असे कुठेही म्हटले नाही. त्रीभाषा सूत्र असे म्हणत मेख मारली आहे, असा आरोप डॉ. तारा भवाळकर यांनी केला आहे. तुम्हीच तिसरी भाषा निवडा असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या चतुरपणाने म्हंटले आहे. लहान कोवळ्या मुलांवर अन्याय करू नका, चौथीपर्यंत मातृभाषा शिकवावी आणि त्यानंतर अन्य भाषेबाबत विचार करावा. माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही, मात्र हिंदीची शक्ती करू नये, असं मत ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांनी माध्यमाला प्रतिक्रिया देताना व्यक्त केलं आहे.
Marathi Vs Hindi: हिंदी सक्तीचा वाद सुरु असताना नव्या पुरस्काराची घोषणा
राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिदींचा पर्याय देण्यात आला आहे, राज्य सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. राज्यात हिंदीची सक्ती नको अशी विविध संघटनांची मागणी आहे. हिंदीच्या मुद्द्यावर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. याविरोधात मनसेनं आंदोलन सुरू केलं आहे. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी मनसेची भूमिका आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना आता तारा भवाळकर यांनी देखील सरकारवर टीका केली आहे.