Breaking

Devendra fadnavis : लोणीकर तुम्ही चुकलेच, मुजोर वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी फटकारले!

CM said, Babanrao Lonikar’s statement is wrong : खडे बोल सुनावले, समज देणार असल्याचे केले स्पष्ट

Mumbai: ‘नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले,’ असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केले यावरून सध्या मोठा वाद पेटला आहे. मुख्यमंत्र्यांनी लोणीकर यांचे वक्तव्य चुकीचे असून त्यांना समज देण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका भाषणामध्ये केलेले वादग्रस्त वक्तव्यात सध्या चांगलीच चर्चेत आले आहे. सोशल मीडिया व सरकार विरोधात टीका करणाऱ्या तरुणांविषयी त्यांनी आक्रमक टीका केली. ‘कुचरवट्यावर’ बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात. इतरांना अंधभक्त म्हणतात, असे म्हणत त्यांच्यापैकी काहींच्या आईचा पगार व बापाची पेन्शन बबनराव लोणीकर यांनीच दिले आहे. असे त्यांनी म्हटले. सोबतच नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी 6 हजार रुपये दिले असेही वादग्रस्त वक्तव्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोणीकर यांच्या या वक्तव्यावर खडे बोल सुनावले आहेत.

Farmers’ organizations : असशील तू लोणीकर, पण मीही तुपकर आहे !

मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे की लोणीकरांचे विधान हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी जरी काही लोकांना उद्देशून असे वक्तव्य केले असले तरी अशा प्रकारचे विधान करायला कोणालाही अधिकार नाही. देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे, आणि आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे लोणीकर यांचे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. याची समज लोणीकर यांना देण्यात येईल.

Vijay Wadettiwar : इतके माजू नका रे… हेच शेतकरी तुम्हाला पुन्हा शुन्यावर आणतील !

लोणीकर यांनी काही टीकाकार मुलांना उद्देशून म्हटले होते की, त्या कार्ट्यांच्या मायचा पगार बबनराव लोणीकर ने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायचा, तुझ्या बहिणी व बायकाच्या नावावर लाडकी बहीण योजनेचा पैसा आला. तुझ्या अंगावर कपडा आमच्या सरकारनं दिला. तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्या मुळेच आहे. आमचेच पैसे घेतात आणि आमच्यावरच बोलतात का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहिता का? असे वादग्रस्त वक्तव्य आ. लोणीकर यांनी केले होते. लोणीकर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वाद पेटला असून सर्वच बाजूने त्यांच्यावर टीका होत आहे. संजय राऊत यांनीही त्यांच्यावर आक्रमक शब्दात टीका केली होती यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करत त्यांना समजण्याचे स्पष्ट केले आहे