Breaking

Bacchu Kadu : एकल महिलांचा हक्कासाठी एल्गार; १४ जुलैला विदर्भस्तरीय मंथन

Women will protest for their rights : बच्चू कडूंच्या उपस्थितीत आंदोलनाचा निर्णय; मोझरीत बैठक

Amravati एकल महिलांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी एल्गार उभारण्याचा निर्धार केला आहे. गुरुकुंज मोझरी येथील किलबिल सेंटरमध्ये अलीकडेच सहा जिल्ह्यांतील एकल महिला किसान संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत एकल महिलांच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी विविध मागण्या मांडण्यात आल्या.

या वेळी माजी मंत्री बच्चू कडू, ज्येष्ठ विचारवंत डॉ. मधुकर गुंबळे, जिल्हा संयोजिका विजया वाढोणकर, कार्यकर्त्या मनूबाई वरठी व सोमेश्वर चांदूरकर उपस्थित होते. एकल महिलांना दरमहा ६ हजार रुपये मानधन, अंत्योदय रेशन कार्ड उपलब्ध करून देणे, मुला-मुलींना शासकीय वसतिगृहात प्रवेश, शेतीसाठी २० हजार रुपये अनुदान, घरकुल योजनेत प्राधान्य, बिनव्याजी कर्ज योजना, रोजगार हमी योजनेचा शेतीसाठी समावेश, या मुख्य मागण्या असणार आहेत.

Chandrashekhar Bawankule : पालकमंत्री बावनकुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर संतापले!

या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर येत्या १४ जुलै रोजी यवतमाळ येथे विदर्भातील निवडक एकल महिलांचे मंथन आयोजित करण्यात येणार आहे. त्यातून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
शेतकरी व एकल महिलांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी अलीकडेच दिव्यांग व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण केले होते. त्याच उपोषणातून प्रेरणा घेत आता एकल महिलाही आपल्या अधिकारांसाठी सज्ज झाल्या आहेत, असे सांगण्यात आले.