Breaking

Gondia Zilla Parishad Elections : काय असेल सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ?

 

No chance of tug-of-war between BJP and NCP : भाजप-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता कमीच

Gondia अडीच वर्षांपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेला निर्णय पाच वर्ष कायम राहणार आहे. भाजपच्या काही सदस्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा सूर आळवला होता. परंतु, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अध्यक्षपद भाजपच्या खात्यात, उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात याच फॉर्म्युल्यानुसार निवडणूक होणार आहे, असे चित्र आहे. मात्र आधीचाच फॉर्म्युला कायम ठेवतात की, नवे समीकरण जन्माला येते, हे वेळच ठरवेल.

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ सदस्य आहेत. यांपैकी दोन सदस्यांना आधीच संधी मिळाली आहे. त्यामुळे उर्वरित सहा सदस्यांमधून दोघांना संधी मिळणार आहे. यात एकाची उपाध्यक्षपदी तर एकाची सभापतिपदी वर्णी लागणार आहे. हे दोन सदस्य कोण हे ठरवण्यासाठी सध्या चर्चा सुरू आहे.

68 Gram Panchayats will get own building : ६८ ग्रामपंचायतींना मिळणार हक्काची इमारत !

 

गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषयी समिती सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाला. त्यामुळे आता पुढील अडीच वर्षांसाठी नवीन निवडणुका २४ जानेवारीला होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे संख्याबळ वाढल्याने भाजप स्वबळाने सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, भाजप नेतृत्वाने भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच फाॅर्म्युल्याने सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Panchayat samiti election : उपसभापतीपदासाठी काँग्रेस अर्ज भरणार!

गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये एकूण ५३ सदस्य आहेत, ज्यात भाजपचे २६, काँग्रेसचे १३, चाबी संघटनेचे ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आणि दोन अपक्ष सदस्य आहेत. अडीच वर्षांपूर्वी, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी संघटना आणि दोन अपक्ष सदस्यांच्या साथीने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. आता चाबी संघटना भाजपमध्ये विलीन झाली आहे आणि एक अपक्ष सदस्यही भाजपसोबत आहे, यामुळे भाजपची ताकद वाढली आहे.

विद्यमान पदाधिकाऱ्यांपैकी दोन पदाधिकाऱ्यांना अद्यापही खुर्चीचा मोह आवरत नसल्याची चर्चा आहे. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याऐवजी त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे फिल्डिंग लावली असल्याची माहिती आहे. या दोन पदाधिकाऱ्यांची चर्चा सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे