demands declaration of a wet drought : अमरावतीत प्रहार पक्षाची मागणी: जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा
Amravati पावसासह अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात पिकांना हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत घसरण झाली असून, डोक्यावरील कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढत आहे.
यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी आणि जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी प्रहार पक्षाने शुक्रवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनाद्वारे केली.
प्रहार पक्षाचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, महानगर प्रमुख बंटी रामेटेके आणि संपर्कप्रमुख गोलू पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, मागण्यांना मंजुरी न दिल्यास प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन उभारले जाईल.
कापूस नोंदणीस मुदतवाढ – आता ३१ ऑक्टोबरपर्यंत
अमरावती: भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यांनी १ ते ३० सप्टेंबरपर्यंत कपास नोंदणीसाठी कालावधी दिला होता. शेतकऱ्यांच्या आणि राज्य शासनाच्या मागणीला प्रतिसाद देत, ही मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ZP Teachers’ Transfers : न्यायालय श्रेष्ठ की महामुनी व आमदार सुधाकर अडबाले ?
कपास किसान मोबाइल ॲपद्वारे हमिभावाने कापूस विक्रीसाठी पूर्व नोंदणी आता या नवीन मुदतीपर्यंत करता येईल. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.








