व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Maharashtra politics : ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक? एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या प्लॅनला भाजपचा...

Maharashtra politics : ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक? एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या प्लॅनला भाजपचा रेड सिग्नल!

eknath-shinde-operation-tiger-bjp-brake-thackeray-pawar-mps-maharashtra-politics-2026 : ठाकरे-पवार गटातील १२ खासदारांवर डोळा

Mumbai: राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’वर भाजप हायकमांडने सध्या ब्रेक लावल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी ठाकरे आणि पवार गटातील खासदारांना आपल्या गोटात आणण्याची आखणी केली होती. मात्र या हालचालींना भाजपकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ‘ऑपरेशन तुतारी’ राबवण्याचा शिंदे गटाचा विचार होता. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटातील ६ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील ६ खासदारांना आपल्या बाजूला वळवण्याची रणनीती आखण्यात आली होती. सध्या शिंदे गटाकडे ७ खासदार असून या संभाव्य वाढीमुळे हा आकडा १९ वर पोहोचला असता आणि त्यामुळे केंद्र तसेच राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये शिंदे यांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असती.

Iran war strategy : “होर्मुझ बंद राहिली तरी चालेल, पण युद्ध थांबवा”

या वाढत्या संख्याबळाच्या जोरावर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत अधिक जागांवर दावा करण्याचीही शिंदे यांची तयारी होती. मात्र भाजप हायकमांडने या हालचालींवर संयम ठेवण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. विशेषतः पवार गटातील खासदारांना थेट फोडण्यापेक्षा त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गटातूनच एनडीएमध्ये येण्याचा मार्ग स्वीकारावा, असा संदेश देण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, दिल्लीतील अलीकडील भेटीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे यांची भेट घेतली नसल्याचीही चर्चा आहे, ज्यातून भाजपकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. महायुतीमधील सध्याच्या सत्तासंतुलनाचा विचार करता, मोठे राजकीय प्रयोग टाळण्याची रणनीती आखली गेल्याचे मानले जात आहे.

राज्यातील काही खासदार आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करत असल्यामुळे गटांतराच्या चर्चा रंगत आहेत. केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने विकासकामांसाठी निधी मिळवण्याच्या दृष्टीने काही खासदार सत्ताधारी गटाकडे झुकत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन टायगर’ सारख्या हालचालींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Ashok kharat case : ‘व्हीआयपी दरबार’चा पर्दाफाश; अशोक खरात ‘स्पॉट व्हिजिट’साठी ५ लाख आकारायचा !

एकूणच, एकनाथ शिंदे यांच्या या मोठ्या राजकीय डावाला सध्या थोडा ब्रेक लागला असला तरी भविष्यात परिस्थिती बदलल्यास हे ऑपरेशन पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

error: Content is protected !!