The plight of Amravati devotees during the Kumbh Mela : गैरसोयीमुळे पोलीस आयुक्तालयावर धडक, पैसे उकळणाऱ्या सूरज मिश्रावर कारवाईची मागणी, आमदार राणा यांना यांच्या कडेही केली तक्रार
Amravati शहरातील ४२७ भाविक २७ जानेवारीला प्रयागराजसाठी रवाना झाले होते. या भाविकांकडून शहरातील सूरज मिश्रा याने प्रत्येकी ६,००० रुपये घेतले होते. त्यामध्ये प्रवास, जेवण, चहा आणि निवास व्यवस्था देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रयागराजला पोहोचताच कोणतीही सुविधा मिळाली नाही, असा आरोप भाविकांनी केला आहे. या संदर्भात भाविकांनी आमदार रवी राणा यांच्याकडे सुद्धा तक्रार केली आहे.
सूरज मिश्रा भाविकांना प्लॅटफॉर्मवर सोडून निघून गेला. त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अमरावतीत परतल्यानंतर संतप्त भाविकांनी शनिवारी पोलिस आयुक्तालयावर धडक दिली. सूरज मिश्रावर कठोर कारवाईची मागणी केली. प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेल्यानंतर गर्दीमुळे बसेस ४० किलोमीटर अलीकडे थांबवण्यात आल्या.
CM Devendra Fadnavis : विकसित भारताच्या घोडदौडीत महाराष्ट्र अग्रेसर राहील
मुख्य स्थळी जाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तिथे पोहोचल्यावर फक्त ५०० चौरस फूट तंबूत सर्व भाविकांना राहण्याची व झोपण्याची व्यवस्था केली होती, अशी आपबिती भाविकांनी सांगितली. जेवणाच्या नावाखाली फक्त महाप्रसाद घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. त्यानंतर स्थानिक पोलिसांकडे मदत मागावी लागली.
भाविकांचे बसेसपासून अंतर ४० किमी होते, त्यामुळे त्याठिकाणी पोहोचण्यास त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अखेर त्याच बसेसमधून शनिवारी अमरावती गाठल्यानंतर संतप्त भाविकांनी पोलिस ठाणे गाठले. भाविकांनी प्रथम राजापेठ पोलिस ठाण्यात सूरज मिश्राविरोधात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ऐकून न घेतल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे हे सर्व भाविक थेट पोलिस आयुक्तालयावर धडकले.
Chandrashekhar Bawankule : जिल्ह्यातील प्रत्येक शाळा होणार डिजीटल
त्याचवेळी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा ‘पोलीस कुटुंबीयांशी संवाद’ कार्यक्रम सुरू होता. भाविकांनी थेट कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवले. नंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भाविकांशी चर्चा केली आणि फ्रेजपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगितले.
सूरज मिश्राने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्यामुळे पोलिसांनी ४० किलोमीटर अलीकडेच बस थांबवली. आम्ही सेक्टर १९ आणि २० मध्ये टेंट बुक केले होते, मात्र गर्दीमुळे ते तंबू मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही सेक्टर ५ मध्ये तातडीने नवीन तंबू बुक केला. तिथे गवत टाकून, त्यावर सतरंजी टाकून राहण्याची व्यवस्था केली होती. तरीही काहींनी व्हिडीओ काढून बदनामी करण्याचा प्रयत्न केला,’ असे सुरज मिश्राने म्हटले आहे.