Strong opposition to smart meter employees : वीज ग्राहक संघटनांचा आंदोलनाचा इशारा
Amravati राज्यात पुन्हा एकदा स्मार्ट वीज मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या तयारीत असलेल्या महावितरणला ग्राहक आणि कर्मचाऱ्यांकडून विरोधाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने स्मार्ट मीटरविरोधात ‘अमान्य अर्ज’ जारी करून ग्राहकांना त्यात सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री आणि तत्कालीन ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जुलै २०२४ रोजी राज्यभर स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची घोषणा केली होती. मात्र, सरकारने यास विलंब देत आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. जिल्ह्यातील ७६,७०४ ग्राहकांचे मीटर फॉल्टी असल्याने त्यांना डिजिटल मीटर बसवले जाणार असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला जोर दिला जात असताना वीज कर्मचाऱ्यांनी मात्र या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटी एम्प्लॉईज अँड इंजिनियर्सतर्फे २३ फेब्रुवारीला नागपुरात राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
एम.एस.ई. वर्कस फेडरेशनने आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर बसवू नका, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, प्रशासनाकडून बळजबरी होत असेल, तर संघटनेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Dr. Pankaj Bhoyar : शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा
महावितरणच्या म्हणण्यानुसार, फॉल्टी मीटरच्या जागी बसवले जाणारे मीटर फक्त डिजिटल असतील. त्यात प्रीपेड किंवा पोस्टपेड पर्याय उपलब्ध नसेल. ग्राहकांसाठी लवकरच मोबाईल ॲप सुरू करण्यात येणार असून, याच्या माध्यमातून ग्राहकांना दैनंदिन वीज वापराची माहिती मोबाईलवर मिळणार आहे.
फॉल्टी मीटर बदलण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. मात्र, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे प्रशासन कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती करत आहे. जर बळजबरी होत असेल, तर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.