Unrest in Leaders of Maharashtra Congress : काँग्रेसच्या निर्णयाने महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये नाराजी
Nagpur महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर आता अखेर हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे मजबुरी का प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात काँग्रेसचे लोढणे टाकल्याचे बोलले जात आहे.
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर मराठा नेत्याकडे पक्षाचे सूत्रे द्यावी, असा निर्णय झाला होता. त्यामुळे कोल्हापूरचे सतेज पाटील, सांगलीचे विश्वजीत कदम वा लातूर अमित देशमुख या तरुण नेत्यांकडे सूत्रे द्यावी, असा विचार झाला. परंतु या तिघांनी या स्थितीमध्ये काँग्रेसचे नेतृत्व करण्यास फारसी उत्सुकता दाखविली नाही. त्यामुळे अखेर तरुण परंतु मराठा समाजातील नेतृत्वाकडे देण्यासाठी शोध सुरू झाला.
Vijay Wadettiwar Harshawardhan Sapkal : काँग्रेसची महाराष्ट्रातील सूत्रं विदर्भाकडेच!
भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांच्या जवळ गेलेले हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव समोर आले. ते बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. बुलडाणा येथून २०१४ मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. राहुल वर्तुळातील मीनाक्षी नटराजन व खासदार मुकुल वासनिक यांच्या शिफारशीमुळे सपकाळ यांच्या पारड्यात वजन पडले. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षाचा शोध संपला.
महाराष्ट्रातील काँग्रेससाठी असलेली दोन्ही महत्त्वाची पदे विदर्भातील नेत्यांकडे आहेत. त्यामुळे राज्यातील इतर भागातील नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे तर विधानसभेतील गटनेतेपदाची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ही दोन्ही महत्त्वाची पदे विदर्भाच्या वाट्याला आल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
गेल्या काही वर्षापासून प्रदेशाध्यक्षपद विदर्भाकडे आहे. नाना पटोले यांच्यापूर्वी यवतमाळचे माणिकराव ठाकरे यांच्याकडे जवळपास ९ वर्षे प्रदेशाध्यक्ष पद विदर्भात राहिले आहे. हर्षवर्धन सपकाळ विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. सर्वोदय चळवळ व काँग्रेसच्या युवकांना गांधी दर्शनाच्या संदर्भात प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमात ते व्यस्त होते.
Maharashtra Congress : हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ!
गेल्या काही वर्षांपासून त्यांनी निवडणूक सुद्धा लढविलेली नाही. अशा व्यक्तीला एकदम सक्रिय राजकारणातील प्रदेशाध्यक्षपद देण्यामागचा काँग्रेसचा श्रेष्ठींचा हेतून समजण्या पलिकडे असल्याच्या प्रतिक्रिया काँग्रेस नेते आता व्यक्त करीत आहे. काँग्रेस श्रेष्ठींच्या या निर्णयाने विदर्भ सोडून इतर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये जोरदार नाराजी पसरण्याची शक्यता आहे. यामुळे काही जण भाजपच्या गोटात जाण्यची शक्यता वर्तविण्यात येत आहे.