Breaking

Belora Airport : अमरावती-मुंबई विमानसेवा लवकरच!

Amravati-Mumbai flight service coming soon : पश्चिम विदर्भातील प्रवाशांची मोठी सोय; बेलोरा विमानतळावरून सेवा

Amravati पश्चिम विदर्भातील हवाई प्रवाशांसाठी नागपूर विमानतळ हा एकमेव पर्याय आहे. शिवाय बाहेरून येणाऱ्यांनाही नागपूर विमानतळाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता अमरावती येथील बेलोरा विमानतळ सज्ज झाले आहे. लवकरच याठिकाणाहून मुंबईसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.

बेलोरा विमानतळावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या चमूकडून ‘हवाई कॅलिब्रेशन’ प्रक्रिया मंगळवारी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे आता एप्रिलपासून अमरावती-मुंबई एटीआर ७२ विमानसेवा सुरू होणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीसाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. ही अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी आहे.

Ladki Bahin Scheme : २२ हजार बहिणी एका क्षणात झाल्या नावडत्या!

या चाचणीदरम्यान बेलोरा विमानतळाचे ‘प्रेसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर’ (PAPI) प्रणालीचे यशस्वी कॅलिब्रेशन करण्यात आले. ही प्रणाली धावपट्टीवर येणाऱ्या विमानांना योग्य ग्लाइड स्लोप राखण्यास मदत करते, जे सुरक्षित लँडिंगसाठी आवश्यक असते. बेलोरा विमानतळावर लावण्यात आलेली सर्व उपकरणे आंतरराष्ट्रीय विमानचालन संस्थांद्वारे निर्धारित कठोर मानकांनुसार तपासण्यात आली आहेत. विमानतळ सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासी सेवेसाठी सज्ज होत असल्याचे विमानतळ तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Abu Azmi controversy : ठाकरे गट, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या फ्लाइट इन्स्पेक्शन युनिटने बीच एअर ३६० ईआर टर्बोप्रॉप विमानाद्वारे चाचणी पूर्ण केली. विमानाचे कॅप्टन अनूप काचरू यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय चमूने कॅलिब्रेशन प्रक्रिया पार पाडली. बेलोरा विमानतळावर पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर आणि सिव्हिल वर्क पूर्ण झाले आहे. आता फक्त काही अंतिम सुरक्षा तपासण्या आणि परवाने मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.