Police administration on alert after tension in central Nagpur : मध्य नागपुरातील तणावानंतर पोलीस प्रशासन अलर्ट
Nagpur मुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दोन गटांमध्ये वाद झाला आणि धार्मिक दंगल Nagpur Violence घडली. या घटनेनंतर पोलीस प्रशासनासह सारेच अलर्ट मोडवर आले आहेत. गांधीबाग, महाल, कोतवाली, गणेशपेठ या भागांमध्ये कर्फ्यूसदृष्य वातावरण आहे. पण एका गटाने नारेबाजी केली आणि त्यामुळेच ही दंगल पेटल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.
एक गट पोलिसांना शांतपणे निवेदन देतो. पोलीस निवेदन स्विकारतात. त्या क्षणाला पोलिसांना एवढा भयंकर प्रकार घडेल, याची कल्पनाही नव्हती. निवेदन दिल्यानंतर तो गट पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतो आणि एका विशिष्ट्य ठिकाणी जाऊन नारेबाजी करतो. त्यावरून दुसऱ्या गटाच्या भावना दुखावतात. ते पोलिसांकडे धावा घेतात. पण तोपर्यंत वाद पेटलेला असतो आणि जाळपोळ, दगडफेक सुरू झालेली असते.
Ajit Pawar : यांना अरे म्हणता येत असेल, तर मलाही कारे म्हणता येतं !
या घटनेने साऱ्या देशाचे लक्ष वेधले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थान आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे शहर या तीन कारणांमुळे ही घटना संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरली. औरंगजेबाच्या कबरीवरून हा प्रकार घडला. पण मुळात नागपूरचा भौतिकदृष्ट्या त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. पण तरीही काही लोकांनी केलेल्या नारेबाजीमुळे हा प्रकार घडला. यामध्ये पोलिसांना अश्रुधुरांचा वापर करावा लागला. लाठीचार्ज करावा लागला.
रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जाळपोळ, दगडफेक Stone Pelting करणाऱ्या २५ लोकांना ताब्यात घेतले होते. या दंगलीत अनेक पोलीसही जखमी झाले. विशेष म्हणजे सायंकाळी घडलेल्या या प्रकारानंतर संपूर्ण शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आले होते. तर एकट्या महाल परिसरात एक हजार पोलीस तैनात करण्यात आले.
Ajit Pawar : म्हणून तुम्ही बोटांवर मोजण्याइतक्या संख्येने निवडून आले !
तेव्हाही असे घडले नव्हते
१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडली त्यावेळी देशभर मोठा धार्मिक तेढ निर्माण झाली होती. अनेक शहरांमध्ये धार्मिक दंगल घडली. पण नागपुरात असा कुठलाच प्रकार घडलेला नव्हता. त्याच कालावधीत मोमिनपुऱ्यामध्ये पोलिसांना गोळीबार करावा लागला होता, पण त्याला कुठल्याही धार्मिक वादाचे कारण नव्हते. त्यापूर्वी १९२७ मध्ये दंगल घडली होती. त्यात काही लोकांचा मृत्यूही झाला होता, असं जुने-जाणते लोक सांगतात.