Breaking

Maharashtra State Seed Corporation : महाबीजमध्ये कामगार नसल्याचा शेतकऱ्यांना फटका!

Farmers hit by lack of workers in Mahabeej : वखार प्रमुख उडवाउडवीची उत्तरे देऊन करतात शेतकऱ्यांची गळचेपी

Wardha महाबीज महामंडळाकडून बियाणे उत्पादनासाठी शेतकऱ्याला फाउंडेशनचे बियाणे दिले जाते. अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून त्याने उत्पादित केलेले बियाणे घेऊन त्याची गुणवत्ता तपासून पुढच्या वर्षी बियाणे म्हणून बाजारात विक्रीसाठी आणले जाते. बाजारापेक्षा सातशे-आठशे रुपये दर जास्त मिळत असल्याने परिसरातील अनेक शेतकरी आपली नोंदणी करतात.

यात बियाणे नापास होण्याचीसुद्धा भीती असते. शेतमाल जसे सोयाबीन तूर, गहू, चना घेतल्यानंतर ८ दिवसांतच बाजारातील दराने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. वाढीव दराची उर्वरित रक्कम बियाणे प्रमाणित झाल्यानंतर शेतकऱ्याला मिळते. परंतु येथील महाबीजमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे शेेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

MLA Sameer Kunawar : १७५ कोटी रुपयांचा खर्च, रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच ऐशीतैशी!

शेतमालाला बाजारात सरासरी जो भाव आहे त्या दराने सुरुवातीला शेतकऱ्यांना रक्कम मिळते. बियाणे पास झाल्यावर उर्वरित वाढीव रक्कम मिळते. शेतकऱ्याला बाजारभावापेक्षा जास्त रक्कम मिळत असल्याने महाबीजला आपला उत्पादित बियाण्याचा शेतमाल विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. एकाच वेळी अनेक शेतकरी आपला माल सेलू येथील केंद्रावर घेऊन येतात.

मात्र, यंत्रणा तोकडी असल्याने मालाचे वजन माप करून जमा करण्यास दोन दोन दिवस लागतात. याचा त्रास शेतकऱ्याला नाहक सहन करावा लागतो. माल खाली करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिला जातो. मात्र, कामगारांची संख्या गरजेपेक्षा खूपच कमी असल्याने वाहनांच्या रांगा लागतात. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची अडचण दूर करणे गरजेचे आहे. मात्र, वखार प्रमुख उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकऱ्यांची गळचेपी करीत असल्याची प्रत्यक्ष तिथे गेलेल्या शेतकऱ्यांची तक्रार आहे.

Mahayuti Government : ग्रामपंचायतींची गृह, पाणी कर वसुली ५० कोटींवर!

आम्ही आमचे कार्यालयीन वेळेनुसार काम करतो. त्या वेळात जेवढ्या गाड्या खाली होतात तेवढ्या केल्या जातात. आमचे काम बाजार समितीसारखे नाही. वाटल्यास तुम्ही डी. एम. कडे तक्रार करू शकता, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.