Breaking

Collector of Buldhana : तरुणांनी उभारावे प्रक्रिया उद्योग

Inauguration of Exporter Promotion Workshop : निर्यात करणारे उद्योग उभारणे आवश्यक

Buldhana जिल्ह्यात कापूस, मका, सोयाबीन आदी शेतमालांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात होते. परंतू शेतमालावर प्रक्रिया करुन निर्यात करणारे उद्योग कमी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नवउद्योजक, निर्यातदारांनी कच्चा शेतमालावरील प्रक्रिया उद्योग उभारुन निर्यात वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले. या उद्योगांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून भरीव अनुदानही दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील पुढे म्हणाले, ‘बुलढाणा जिल्हा हा अमरावती विभागात सर्वाधिक निर्यात करणारा जिल्हा आहे. सन २०२३-२४ मध्ये ८४१ कोटी निर्यात केली आहे. तसेच ऑक्टोबर २०२४ पर्यंत ४६५ कोटी झाली आहे. त्यात प्रामुख्याने कापूस,ऑरगॅनिक केमिकल्स, कॉस्मेटिक उत्पादने, इंजिनियरिंग उत्पादने, डाळी, बी-बियाणे, रोपटे निर्यात केली जाते.’

Vijay वडेट्टीवार : भाजपमध्ये होतोय शिंदेंच्या शिवसेनेचा ‘उदय’!

बुलढाणा जिल्हा हा कृषिप्रधान आहे. जिल्ह्यात शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, शेतमालावर प्रक्रिया करुन निर्यात करणारे उद्योग घटक फारसे नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात कापूस व मक्यावर प्रक्रिया करणे. आणि उपउत्पादने तयार करुन निर्यात करणारे उद्योग उभारणे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.

देशात ६० टक्के खाद्यतेल हे आयात केले जाते. बुलढाणा जिल्ह्यात सोयबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, परंतू प्रक्रिया उद्योग नसल्याने कृषी उत्पादनाला फारसा भाव मिळत नाही. यासाठी शेतकरी उत्पादक संस्था, कंपन्यांनी कृषीमाल संकलित करुन प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

Rajkumar Patel : मेळघाटातील आदिवासी भागांचा विकास ठप्प

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या औद्योगिक समूह योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया, फळ प्रक्रिया यासारखे नवीन समूह उद्योग उभारण्यात यावेत. जिल्ह्याची औद्योगिक, आर्थिक क्षमता ही जमेची बाजू आहे. भविष्यात बुलढाणा जिल्हा हा औद्योगिक हब होऊ शकतो. नवउद्योजक, निर्यातदारांनी मरगळ झटकून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी मैदानात उतरले पाहिजे. उद्योग उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमार्फत ९० टक्क्यापर्यंत भरीव अनुदानही दिले जाते. त्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.