Breaking

Devendra Fadanvis : पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही !

Fadnavis issues stern warning to those who attack police : सकाळच्या घटनेनंतर शांतता होती, सायंकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केला

Mumbai : काल नागपुरातील महाल परिसरात सकाळी ११.३० वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘औरंगजेबाची कबर हटाव..’, असे नारे देत आंदोलन केले. सकाळची घटना घडल्यानंतर दिवसभर शांतता होती. पण सायंकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचे लक्षात आले. यावेळी जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवला. पोलिसांवर हल्ला करणारा मग तो कुणीही असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याला सोडणार नाही, असा सज्जड दम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

काल (१७ मार्च) नागपुरात दंगलसदृष्य परिस्थिती झाल्यानंतर आज (१८ मार्च) मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात यावर निवेदन केले. ते म्हणाले सायंकाळचा हल्ला पूर्वनियोजित होता. कारण तेथे एक ट्रॉलीभरून दगड मिळाले. ते काही लोकांनी जमा करून ठेवले. काही शस्त्रही तेथे सापडले. वाहनांची जाळपोळ झालेली आहे. काही निवडक घरांना आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. याच्यामध्ये काही लोकांचा सुनियोजीत पॅटर्न दिसतोय. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कायदा हाती घेण्याची परवानगी कुणालाही देण्यात येणार नाही.

Devendra Fadnavis Politics : विधानसभेत थांबवले, परिषदेत सावरले!

पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला, त्याला काही झालं तरी सोडलं जाणार नाही. पोलिस तेथे शांतता प्रस्थापित करत होते. त्यांच्यावर हल्ला करणे अमानवीय आहे. महाराष्ट्रात शांतता ठेवण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जनता नागपुरातील असो की महाराष्ट्रातील मी सर्वांनी विनंती करतो की, सध्या धार्मीक सण चाललेले आहेत. एकमेकांच्या प्रती आदरभाव कसा राहील, याचा प्रयत्न करावा, असे म्हणत पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

अशी घडली घटना..
काल सकाळी ११.३० वाजता विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव, असे नारे देत आंदोलन केले. गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर शांतता होती. सायंकाळी अफवा पसरवली गेली की, जी प्रतिकात्मक कबर जाळली त्यावर कापडावर धार्मीक मजकूर होता. अत्तर ओळमधून नमाज करून आलेल्या २०० ते २५० लोकांचा जमाव एकत्र आला. त्यांनी ‘जाळून टाकूचे..’ नारे दिले.

Devendra Fadnavis : मोदींच्या भेटीसाठी फडणवीस दिल्लीत, शिंदे गट अस्वस्थ

सौम्य बळाचा वापर..
बजरंग दलाच्या विरोधात तक्रार करायची आहे, अशी माहिती दिल्यावर त्यांना बोलावण्यात आले होते. दरम्यान दुसरीकडे हंसापुरी भागात २०० ते ३०० लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत १२ दुचाकींचे नुकसान झाले. काहींवर घातक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. तिसरी घटना शहरातील भालदारपुरा भागात सायंकाळी ७.३० वाजता घडली. ८० ते १०० लोकांचा जमाव होता. जमावाने पोलिसांवर हल्ला केला. यावेळी अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला. एक क्रेन, दोन जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आली.

उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला..
या संपुर्ण घटनेमध्ये ३३ पोलिस जखमी झाले आहेत. तीन उपायुक्त दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांपैकी एकावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. पाच नागरिक जखमी आहेत. त्यांपैकी तिघांना उपचार करून सोडले. दोन रुग्णालयात आहेत, तर एक आयसीयुत आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तहसील पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकुण पाच गुन्हे दाखल झाले आहेत.

११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एंट्री पॉइंट वर नाकाबंदी करण्यात आली आहे. यामध्ये गणेशपेठ, तहसील, पाचपावली, लकडगंज शांतीनगर, नंदनवन, इमामवाडा, सक्करदरा, नंदनवन, कपिल नगर आणि यशोधरा नगर पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस महासंचलकांनी अधिकाऱ्यांची व्हीसी घेऊन राज्यभर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

भावना प्रज्वलीत झाल्या..
खरं तर छावा चित्रपटाने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. त्यानंतर लोकांच्या भावना प्रज्वलीत झाल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा राग उफाळून येतोय. महाराष्ट्र प्रगतीशील राज्य आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. कुणीही दंगल घडवण्याचा प्रयत्न करू नये. दंगल करणाऱ्यांवर जात, धर्म न पाहता कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

तणावपूर्ण शांतता..
नागपुरात काल झालेल्या राड्यानंतर आज महाल परिसरात संचारबंदी लागू झालेली आहे. शिवाजी चौकाच्या अवतीभवतीची संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. बॅंका, एटीएम खासगी दुकाने बंद आहेत. पोलिसांची वाहने सतत फिरत आहेत. लोकांना घराच्या आतमध्ये राहण्याची विनंती पोलिसांकडून केली जात आहे. सतत सायरन ऐकायला येत आहेत. शिवाजी चौकाला चारही बाजुंनी बॅरीगेटींग करण्यात आले आहे. आज दिवसभर संचारबंदी कायम राहणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.