Eknath Shinde may demand for Mayor post : बहुमतानंतर वाढला पेच, फडणविसांच्या भूमिकेकडे लागले लक्ष
Mumbai मुंबई महापालिका निवडणुकीनंतर महापौरपदाबाबत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे यांनी केलेली महत्त्वाची भूमिका सध्या राज्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. निवडणुकीत भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीने एकत्र यश मिळवले आणि मुंबईतही युतीचा महापौर बसणार आहे. मात्र “आमच्या युतीत कोणीही मोठा किंवा धाकटा भाऊ नाही.” या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी महापौरपदावर मत व्यक्त करताना सांगितले की, महापौर पदापेक्षा मुंबईत योग्य प्रकारे प्रशासनाची स्थापन होणे अधिक महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की महापौर महत्त्वाचा नक्कीच आहे, पण मुंबईची प्रतिमा आणि कामगिरी शहराप्रमाणे उभे राहावी ही सर्वांपेक्षा मोठी जबाबदारी आहे.
शिंदेंनी महायुतीच्या यशाबद्दल जनतेचे आभार मानले आणि नमूद केले की फक्त विकास हा ब्रँड आहे आणि जनतेने त्या विकासावर विश्वास ठेवला आहे. त्यांनी हेही सांगितले की, भाजप आणि शिवसेना मिळून विकासाचे काम करणार आहे. तसेच ते म्हणाले की आमच्या युतीत कोणी मोठा भाऊ किंवा धाकटा भाऊ नाही. या विधानाचा नेमका अर्थ काय आहे, याबाबत राजकीय पटलावर चर्चा निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे भाजपची साथ सोडून काँग्रेसकडे गेले तसे एकनाथ शिंदे वागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
BMC Election 2026 : मुंबई गेली, आता कोकणही जाणार? या कुटुंबाने सोडली ठाकरेंची साथ
१५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीने मुंबईत महापालिकेत चांगल्या जागा जिंकल्या आहेत आणि महायुतीला महापौरपदापर्यंत पोहोचवले आहे. आता पाहायचे आहे की कोणाचा महापौर बसणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आहे?








