Breaking

Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ !

Government exploiting MSRTC employees : सरकारची ऐपत नव्हती तर योजना दिल्या कशाला

Nagpur : शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याची एकही संधी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सोडत नाहीत. कर्जमाफीचे वचन तोडून सरकारने आधीच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आता एस.टी. कर्मचाऱ्यांचा पगार कपात करून त्यांच्याही जखमेवर सरकार मीठ चोळत आहे, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

नागपुरात आज (१० एप्रिल) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रामध्ये धावणाऱ्या 70 ते 80 टक्के एस.टी. बसेस नॉन एसी आहेत. या तप्त उन्हात त्या बसमध्ये बसू शकत नाही. पण चालक वाहक चटके सहन करत सेवा देतात. या गाड्या जुन्या झाल्याने अधिक तापतात. चालक-वाहकांना सोयी सुविधा नाहीत. त्यांना पाणी मिळत नाही. तरीही सेवा देण्याचं काम ते करतात. सरकारची ऐपत नव्हती तर योजना दिल्या कशाला, असा सवाल त्यांनी केला.

Vijay Wadettiwar : बीडमध्ये चोरट्यांचा कहर, चक्क गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल फोन चोरला !

देश स्वतंत्र होत असताना आरएसएसवाले इंग्रजांसोबत बसलेले होते. याचा दाखला अनेक पुस्तकांतून मिळाला आहे. वाटल्यास अजून 200 चारशे वर्ष गुलामगिरी सहन करू. पण असे स्वातंत्र्य नको, ज्यात SC, ST लोकांना समानतेची वागणूक अधिकार मिळत नाही, असे गोळवलकर यांनी पुस्तकात मांडले आहे. यात नवीन काही नाही. इंग्रजांच्या विरोधात सर्व समाज लढत असताना हे इंग्रजांच्या पाठीशी उभे होते हे सत्य आहे. स्वातंत्र्याची लढाई लढण्याचे काम काँग्रेस पक्षाने केली, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar : कृषीमंत्र्यांची भाषा अजूनही अरेरावीची !

कर्जमाफी देण्याची परिस्थिती नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. यावर परिस्थितीनुसार सगळे बदलतात. आता दिवस जास्त दूर नाही. तीन वर्षांनी ते कुठं दिसतील, याचा अंदाज येणे सुरू झाले आहे. त्यांना स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे लागणार आहे. याची तयारी दोन्ही पक्ष करणार नाहीत, तर अस्तित्वशून्य अशी परिस्थिती निर्माण होईल, असेही ते म्हणाले. ई कॅबिनेटसाठी आयपॅड देण्यात येणार आहेत. हे चांगले आहे, ती कामाची गरज आहे आणि यावर फार खर्चही होत नाहीये. पण एस.टी. कर्मचाऱ्यांचे पगार रोखणे योग नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.