Appeal to register protest on Maharashtra Day : महाराष्ट्र दिनाचा जनतेने निषेध नोंदविण्याचे आवाहन
Buldhana “१ मे हा महाराष्ट्र दिन विदर्भासाठी आनंदाचा नाही, तर शोषणाचा आरंभबिंदू ठरला आहे. त्यामुळे हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळावा,” असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केले.
पत्रकार भवन, बुलढाणा येथे समितीच्या जिल्हा शाखेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. बैठकीस महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती रंजनाताई मामर्डे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Prataprao Jadhav : नख गळतीच्या आजाराने केंद्रीय पथकही बुचकाळ्यात!
वामनराव चटप म्हणाले की, “संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विदर्भाने भावनात्मकपणे सहभाग घेतला. मात्र, १ मे १९६० पासून विदर्भाची लूट सुरू झाली. कोळसा, खनिज, वीज, वनसंपदा आणि शेतमाल यांचे शोषण करून विदर्भास मागे टाकले गेले.”
प्रा. डॉ. पी. आर. राजपूत यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील भयावह वास्तव मांडले. “शेवटच्या २० वर्षांत शिक्षक भरती जवळपास बंद आहे. कंत्राटी व तासिका तत्वावर शिक्षकांकडून काम करून घेतले जात असून, अल्प पगारामुळे त्यांची अवस्था बंधुआ कामगारासारखी झाली आहे,” असे ते म्हणाले. २५ मे रोजी अमरावती येथे शिक्षक व सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
विदर्भासाठी स्वतंत्र राज्य हवेच
महिला प्रदेशाध्यक्ष रंजनाताई मामर्डे यांनी जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव मांडताना सांगितले की, “ही चळवळ जनआंदोलनाचे स्वरूप धारण करणार आहे.” सभेच्या अध्यक्षीय भाषणात ॲड. चटप यांनी विदर्भातील सिंचन, धरण प्रकल्प, प्रदूषण, बेरोजगारी, वीज यांसारख्या मुद्द्यांवर आकडेवारीसह माहिती सादर केली.