Breaking

Uddhav Thackeray : ‘ते’ घरातूनच निघत नाहीत, अन् निघालेच तर थेट परदेशात जातात !

 

Eknath Shinde strongly attacked on Uddhav Thackeray : सच्च्या शिवसैनिकाचे कर्तव्य निभावण्यासाठी काश्मीरला गेलो होतो

Buldhana : जम्मू – काश्मीरमधील पहेगाम येथे हल्ला झाल्यानंतर तेथे भयभीत झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना धीर देण्यासाठी गेलो होतो. एक सच्चा शिवसैनिक म्हणून कर्तव्य निभावण्यासाठी गेलो होतो. कुठेही आपत्ती आली की बचाव पथकासह शिवसैनिक म्हणून जात असतो. पण काही लोक घरातूनच बाहेर पडत नाहीत, अन् पडलेच तर थेट परदेशात जातात, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर सडकून टिका केली.

बुलढाणा येथे आज (२७ एप्रिल) आयोजित आभार सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले, आपल्या लोकांना धीर देण्यासाठी, त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी श्रीनगरला गेलो होतो. मात्र त्यावरूनही काहींनी राजकारण केले. देशभर दुखवटा सुरू असताना सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली पाहिजे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या लोकांमध्येही त्यांना राजकारण सुचते. असे राजकारण करणारे पहिल्यांदा पाहिले, अन् कोविडमध्ये मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारेही पहिल्यांदाच पाहिले होते.

Eknath Shinde : उद्या उपमुख्यमंत्री शिंदे बुलढाण्यात, तर आमदार गायकवाडांवर गुन्हा दाखल !

निवडणुकांमध्ये आम्ही राजकीय तापमान इतके वाढवले की, त्यांचे जोरदार चटके त्यांना बसले. त्यामुळे थंडगार हवा खाण्यासाठी ते परदेशात गेले, अशी खरमरीत टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली. अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून राज्यभर जे काम केलं. त्यामुळे जनतेने महायुतीला न भूतो असा विजय मिळवून दिला. लाडक्या बहीणी आणि भावांनी विरोधकांची तोंडं बंद केली. मुख्य म्हणजे काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना मुक्त करण्याचे काम आम्ही केले, असे म्हणत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर जोरदार टिका केली.

Eknath Shinde : पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत शिंदेंचा थेट संवाद

आमच्या सोबत आलेल्या ४० आमदारांपैकी एकही निवडून येणार नाही, असे उबाठा तेव्हा म्हणत होते. पण तेव्हा आमच्यासोबत आले ४० आणि निवडून आले ६०, सात – आठ जागा थोड्याशा फरकाने हारल्या. पुढच्यावेळी हीसुद्धा कसर भरून काढू. बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघेंचे विचार पुढे घेऊन जाणारी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देणारी शिवसेना कुणाची, यावर महाराष्ट्राच्या जनतेनेच शिक्कामोर्तब केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.