Congress’s Sankalp Satyagraha tomorrow in Parli : संस्कृती व परंपरेचे भान असल्याशिवाय गुण्या गोविंदाने राहणे शक्य नाही
Mumbai : नागपूर आणि नाशिकमध्ये काही धर्मांध शक्तींनी सामाजिक शांतता बिघडवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. पण शाहू – फुले – आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात अशा शक्ती कधीही यशस्वी होणार नाहीत. नाशिकमध्ये घडलेल्या हिंसक घटनेत सहभागी असलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे, असे महााराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
नाशिकमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात हुतात्मा स्मारक ते गाडगे महाराज पुलापर्यंत संविधान सद्भावना यात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, खासदार शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त. जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांच्यासह हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Prahar’s agitation : आता बच्चू कडू सर्व मंत्र्यांना घेरणार !
माणुसकीचा धर्म ज्यांनी शिकवला, असे गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्यांच्या हिंदवी स्वराज्याचा विचार आपल्या सर्वांसाठी प्रमाण आहे, असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला नासवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आपल्या सर्वांना मिळून हे प्रयत्न हाणून पाडायचे आहेत. संविधानाने शोषीत, पीडित, दलित व वंचित समाजाला अधिकार दिले. महिलांना मतदानाचा अधिकार दिला. स्त्री – पुरूष समानतेचे सूत्र दिले. त्यानुसार महाराष्ट्रातील लोक गुण्या गोविनंदाने नांदत आहेत.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्याच्या सहमतीशिवाय भूसंपादन नाहीच!
आज काही लोक जातीजातींत, धर्माधर्मांत भांडणे लावत आहेत, हे महाराष्ट्राला निश्चित शोभणारे नाही. जनतेच्या मनात सद्भावना वाढीस लागावी, यासाठी काँग्रेस राज्यात सद्भावना यात्रा काढत आहे. मस्साजोग ते बीड व नागपूर येथील सद्भावना यात्रेनंतर नाशिक शहरात सद्भावना यात्रा काढण्यात आली. उद्या १ मे या महाराष्ट्र दिनी परळीमध्ये काँग्रेस संकल्प सत्याग्रह करणार असल्याची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.