Breaking

Mahayuti Government : श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन आता सरकार साजरा करणार

 

Sri Chakradhar Swami Avatar Day will now be celebrated by Government : ऐतिहासिक निर्णय; 25 ऑगस्ट शासकीय पातळीवर

Amravati महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार दिन भाद्रपद शुद्ध द्वितीया (यावर्षी २५ ऑगस्ट) हा दिवस शासकीय पातळीवर साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे अमरावती जिल्ह्याला आणखी एक सन्मान प्राप्त झाला आहे.

या निर्णयाबाबत सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी परिपत्रक जारी केले असून, राज्याचे महसूलमंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यास दुजोरा दिला आहे. श्रीचक्रधर स्वामींनी १२व्या शतकात सत्य, अहिंसा, मानवता आणि समानता यांसारखी जीवनमूल्ये समाजात रुजविली. आजही त्यांच्या विचारांचा समाजावर खोल प्रभाव आहे.

मोर्शी तालुक्यातील पवित्र रिद्धपूर हे स्वामींच्या कार्यामुळे प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी देशातील पहिले मराठी विद्यापीठ स्थापन करण्यात आले. आता अवतार दिन शासकीय पातळीवर साजरा करण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्याला दुसऱ्यांदा मान मिळाला आहे.

Rural student games : आता विभागीय आणि राज्यस्तरावर खेळतील जिल्हा परिषदेचे विद्यार्थी !

या निर्णयामुळे महानुभाव पंथाचे योगदान महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासात अधोरेखित होईल. स्वामींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचतील आणि समाजाला प्रेरणा मिळेल. मंत्रालयासह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये हा दिवस साजरा करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद आहे.

महानुभाव आश्रम (कंवरनगर) प्रमुख मोहन महाराज कारंजेकर (अमृते) यांनी सांगितले की, “या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे पालकमंत्री बावनकुळे यांनी आभार मानले आहेत.”

Dr. Pankaj Bhoyar : पाण्याच्या कारणाने होणारे स्थलांतर थांबवा!

महानुभाव शिष्टमंडळाने कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकरबाबा यांच्या नेतृत्त्वाखाली २२ मार्च रोजी नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. या शिष्टमंडळात महंत चिरडे बाबा (निफाड), माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रकाशशेठ नन्नावरे, सुनील सांगळे, दत्ताभाऊ गवळी, रवींद्रदादा कारंजेकर, अरविंददादा अमृते, शंतनू इंगोले, रवी उभाळ, हरिहर पांडे, दयानंद पंडीत यांचा समावेश होता.

Vidarbha Farmers : २५५ कोटींचे कर्जवाटप, तरी शेतकरी सावकाराच्या दारी!

या निर्णयामुळे मुंबईतील मंत्रालय आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनातही अवतार दिन राजशिष्टाचारानुसार साजरा केला जाणार आहे. गावपातळीपर्यंत शासकीय स्वरूपात उत्सवाचे आयोजन होणार असून, कार्यक्रमाच्या सूचनांबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील.