Breaking

Caste-wise censuses : बावनकुळेंनी वर्मावरच केला घाव, म्हणाले..

 

Chandrashekhar Bawankule attacks all opponents including Sharad Pawar : औदार्य दाखवणार की नाक मुरडत घाणेरडं राजकारण करणार

Nagpur : जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी गेल्या १० वर्षांतच नाही, तर त्याहीपूर्वीही आहे. अखेर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा काल (३० एप्रिल) केली. पण याच मागणीसाठी गेल्या १० वर्षांत घसा कोरडा पडेपर्यंत ओरडणारे आज कुठे आहेत, असा सवाल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

या संदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांनी X वर प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणतात, ‘जातिनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे आदरणीय शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का बसले आहेत? इतके दिवस जातिनिहाय जनगणना करा म्हणत घसा कोरडा करणारे नेते आता केंद्रातील मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचं औदार्य दाखवणार की नाक मुरडत घाणेरडं राजकारण करणार? हा सामान्य माणसाच्या मनातील सवाल आहे.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्याच्या सहमतीशिवाय भूसंपादन नाहीच!

केवळ आपल्या स्वार्थी राजकारणासाठी या नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी जातीचे संकुचित राजकारण केले. पण या जातीतील नागरिकांना प्रगतीच्या, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एवढ्या वर्षांत या राजकीय पक्षांनी काहीच केले नाही. आता आदरणीय मोदीजी यांच्या सरकारने या जातिनिहाय जनगणनेच्या माध्यमातून या देशातील सर्वच जाती प्रवाहांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संकल्प केला असताना त्यांचे अभिनंदन करण्यासाऐवजी श्रेय लाटण्याचे काम करीत आहेत.

Chandrashekhar Bawankule : शासनावरील विश्वास वाढवण्याचा प्रयत्न

यातून या विरोधी पक्षांची संकुचित मानसिकता देशाला पुन्हा एकदा दिसून आली आहे. देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी जातिनिहाय जनगणनेसारखा क्रांतिकारी निर्णय घेतला. तेव्हा किमान अभिनंदन करण्याचं सौजन्य या नेत्यांनी दाखवावं ही अपेक्षा आहे.’