Harshvardhan Sapkal says caste-wise census is a big victory of Rahul Gandhi : सरसंघचालक, योगी आदित्यनाथ, भाजपचे काही खासदार विरोधात होते
Nagpur : जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने ३० एप्रिल रोजी घेतला. देशभरात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. काँग्रेसनेही या निर्णयाचे स्वागत केले. पण या संदर्भातल्या घडामोडी पाहिल्या तर काँग्रेसने यासाठी मोठा लढा दिला आहे. हा राहुल गांधी यांचा मोठा विजय आहे. फक्त हा जुमला ठरू नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटिचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
नागपुरात आज (२ मे) आले असता सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले केंद्र सरकारला हा निर्णय घेण्यासाठी राहुल गांधी यांनी भाग पाडले. सरसंघचालक, योगी आदित्यनाथ आणि भाजपचे काही खासदार जातिनिहाय जनगणना करण्याच्या विरोधात होते. पण राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ही मागणी लाऊन धरली आणि केंद्र सरकारला हा निर्णय घेण्यास बाध्य केले.
Caste-wise censuses : बावनकुळेंनी वर्मावरच केला घाव, म्हणाले..
खिचडी शिजू द्या..
शरद पवार आणि अजित पवार यांच्या वाढत्या भेटींबद्दल विचारले असता, सध्या यासंदर्भात बऱ्याच चर्चा राज्यभर सुरू आहेत. पण काही घडामोड झाल्यावरच बोलता येईल. जोपर्यंत खिचडी शिजत आहे, तोपर्यंत शिजू द्या. आम्ही महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढलो. आम्ही सोबत होतो आणि आहोत. पुढील काळात काय घडामोडी होतील, त्यावर तेव्हाच भाष्य करता येईल, असे सपकाळ म्हणाले.
७५ लाख मते आली कुठून ?
राज्य सरकारच्या पहिल्या १०० दिवसाच्या कार्यकाळाचा अहवाल समोर आला आहे. त्यावर खोक्या आणि बेताल वक्तव्य करणारे मंत्री या सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यकाळात पाहिले. मतांची चोरी करून हे सरकार निवडून आले आहे. ७५ लाख मते कुठून आली, याचे उत्तर अजूनही दिलेले नाही. १०० दिवसांत जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. पीक विमा बंद करण्यामागे रिलायन्ससारख्या कंपनीला लाभ देण्याचा सरकारचा उद्देश असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.
Caste-wise censuses : जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी मोदी सरकारचा पुन्हा एक डाव !
वर्षभरात बदल होणार..
हे वर्ष काँग्रेसने संघटना वर्ष म्हणून जाहिर केले आहे. त्यानुसार आवश्यक बदल करण्यास सुरूवात झाली आहे. संघटना वर्ष असल्याने फेरफार होणार असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.