The agitation will start from Ajit Pawar’s house, will conclude at CM house : ‘आत्मसन्मान आंदोलन’ २ जूनपासून, प्रहार जनशक्ती पक्षाची घोषणा
Akola राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी ‘आत्मसन्मान आंदोलन’ पुकारले आहे. हे आंदोलन २ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार DCM Ajit Pawar यांच्या निवासस्थानापासून सुरू होईल. आणि ६ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या घरासमोर सांगता होईल, अशी घोषणा कडू यांनी केली.
विशेष म्हणजे, हे आंदोलन शिवराज्याभिषेक दिनी म्हणजेच ६ जून रोजी संपविण्यात येणार आहे. सरकारने तोपर्यंत निर्णय घेतला नाही, तर ७ जूनपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अकोल्यात झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Shivsena Uddhav Balasaheb Thackrey पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी ट्रॅक्टर मोर्चात बच्ची कडू सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कडू म्हणाले, “केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही आंदोलनाशिवाय वेतन आयोगाची शिफारस लागू होते. मात्र, शेतकऱ्यांना कधीच न्याय मिळत नाही. सरकार कधीच दिलेला शब्द पाळत नाही, म्हणूनच आंदोलनाची वेळ आली आहे.” “शेतमालाला योग्य भाव मिळाला तर बँकेचे कर्ज सरकारलाच फेडावे लागणार नाही. आम्हीच आमचं कर्ज फेडू. एवढी ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. पण सरकारने आम्हाला योग्य भाव दिलाच पाहिजे.”
आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार पक्ष रस्त्यावर उतरत आहे. या आंदोलनात विविध शेतकरी संघटनांचा सहभाग आहे. केंद्र व राज्य सरकारने वेळेत ठोस निर्णय न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देखील कडू यांनी यावेळी दिला.
Caste wise census : जातिनिहाय जनगणना; राहुल गांधींचा मोठा विजय !
बापाचे आश्वासन मुलाला पूर्ण करावे लागेल
अजित पवार यांनी कर्जमाफीचे आश्वासन मी दिले नाही,असे म्हणून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. पण महायुती सरकारमध्ये भाजप हा बाप आहे. बापाने दिलेले आश्वासन मुलाला पूर्ण करून द्यावे लागते, असा टोला बच्चू कडू यांनी पवार यांना लगावला.