Breaking

Local Body Elections : भाजप म्हणतेय, ‘निवडणुका आम्हीच जिंकणार’!

BJP leaders are fully confident of winning the elections : राजकीय पट रंगतोय, नेते उतरले मैदानात

Akola स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता माहोल तयार होऊ लागला आहे. भाजपच्या नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर संचारलेला आत्मविश्वास अद्याप कायम आहे. तर विरोधक ‘कमबॅक’ करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. राजकीय पट हळूहळू रंगायला लागला आहे. त्यात भाजपच्या नेत्यांनी आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला महायुतीसोबत बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. जनसंपर्काच्या जोरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

Operation Sindoor : थरार अनुभवणारे पर्यटक म्हणाले, ‘जय हिंद की सेना’!

अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त चोंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले. “या निर्णयामुळे ओबीसी समाजाचा हक्क अबाधित राहिला आहे. कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला आता वाव मिळणार आहे,” असे धोत्रे यांनी स्पष्ट केले.

“स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्ते घडवणारी यंत्रणा असून, सामाजिक कार्य करणाऱ्यांना न्याय देणारी प्रक्रिया ठरते,” असे आमदार वसंत खंडेलवाल यांनी म्हटले. लोकशाहीला पोषक असा हा निर्णय असून, यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मदत होईल, असा विश्वास माजी महापौर विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला. “या निर्णयामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या निवडणुकांना गती मिळणार आहे,” असेही ते म्हणाले.

Operation Sindoor : पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर ठाकरे गटाकडून जल्लोष!

भाजपाचे आमदार किशोर पाटील, हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे, जयंत मसने यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. महिला नेत्यांमध्ये सुमनताई गावंडे, गीतांजली शेगोकार, मोनालीताई गावंडे, वैशालीताई शेळके, वैशाली निकम, सारिका जयस्वाल आणि जयश्री फुंडकर यांनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शवला.