Mungantiwar’s historic work as Minister of Cultural Affairs : समृद्ध इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी घेतले विशेष कष्ट
राज्यकर्ते म्हणून शिवाजी महाराजांनी Chhatrapati Shivaji Maharaj केवळ गड-किल्ले जिंकले नाहीत, तर जनतेची मनंही जिंकलीत. आज, त्यांची वैभवशाली परंपरा आधुनिक भाषेत आधुनिक पिढीला समजेल अश्या भाषेत पोहोचविण्याचा वसा काही व्यक्तींनी उचलला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार हे त्यापैकीच एक प्रभावी नाव. त्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून जे कार्य केले, ते केवळ योजनांच्या आकड्यांत मोजण्यासारखे नाही, तर ती एक सांस्कृतिक चळवळ आहे. या चळवळीची म्हणजेच त्यांच्या कार्याची आठवण अनेक पिढ्या ठेवतील असे कार्य त्यांनी सांस्कृतीक कार्य मंत्री म्हणून केले आहे.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ३५० वा सोहळा, प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवण्याची निर्भीड कारवाई, वाघनखं भारतात परत आणण्याची दूरदृष्टी, आग्रा येथील दिवान-ए-खासमध्ये शिवजयंती साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले सगळे कार्य केवळ स्मरणरंजनापुरत्या नाहीत, तर त्या शिवपरंपरेचा समाजाच्या मनोभूमिकेवर भक्कम पुनर्स्थापना करणाऱ्या आहेत.
Arvind Netam : काँग्रेसचे माजी मंत्री म्हणतात, ‘मी संघाकडे आशेने पाहतो’
‘श्रीशैलम’ येथे मंदिर उभारणे असो वा कुपवाडा सीमारेषेवर अश्वारूढ पुतळा उभारणे असो, हा एक शिवभक्त राजकारण्याचा इतिहासाशी असलेला जिव्हाळा दर्शवतो. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेले हे उपक्रम केवळ स्मारक उभारणं नाही, तर शिवरायांची मूल्यं सीमेवर, समाजात आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये खोलवर रुजवण्याची धडपड होय.
आ.सुधीर मुनगंटीवार सांस्कृतीक कार्य मंत्री असताना त्यांच्या पुढाकारातून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक नेत्रदीपक पद्धतीने साजरा झाला,हा सोहळा शासनाकडून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र घोषित करण्यात आले. प्रतापगडावर माता भवानीला चांदीचे छत्र अर्पण, रायगडावर चांदीची पालखी, विशेष लोगो, होन आणि टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. गेट वे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, राज्यभर ‘जाणता राजा’ नाट्यप्रयोगाचे आयोजन, तसेच अंधांसाठी शिवचरित्र ब्रेल लिपीत प्रसिद्ध करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला.
आज इतिहासातील विकृतीचे उदात्तीकरण होत असताना समृद्ध आणि वैभवशाली इतिहासाचा प्रचार-प्रसार करणं गरजेचं आहे. त्यासाठी अशा ठोस कृतींची नितांत आवश्यकता भासत जाते. कारण इतिहास जर वर्तमानाशी संवाद साधत नसेल, तर तो संग्रहालयात पडून राहतो. पण आ. मुनगंटीवारांनी तो समाजाच्या विचारधारेत पुन्हा एकदा स्थानापन्न केला आहे. ही विचारधारा रुजविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अनेक पिढ्या आठवणीत ठेवतील, यात शंका नाही.
दुर्दम्य इच्छा शक्ति, साहस आणि प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवराय, सर्वांचे आदर्श आहेत. स्वराज्य हे सुराज्य कसे होईल याकडे त्यांनी लक्ष दिले. स्वधर्म आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी सज्ज राहण्याचा संदेश पुढच्या पिढीपर्यंत पोहचवत, सुदृढ समाज निर्मितीसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रमांना यशस्वी केले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दीर्घकालीन सांस्कृतिक दस्ताऐवज राज्याला दिला आहे. या खांद्यांवरून वाहणारी इतिहासाची पालखी शिवरायांच्या स्मृतीनं भारलेली आहे आणि त्या पालखीची सावली महाराष्ट्रातील पुढच्या पिढ्यांच्या मनावर कायम राहील, याची खात्री आहे.