Breaking

Sanjay Gaikwad : शिंदेंचे आमदार म्हणतात, ‘कर्जमाफीची घोषणा फडणविसांची, आमची नाही’

Fadnavis announced the loan waiver for farmers, it was not a decision of the Mahayuti : महायुतीतील मतभेद उघड; निर्णयात राष्ट्रवादीही नसल्याचा दावा

Buldhana “कर्जमाफीची घोषणा ही महायुतीने नव्हे, तर फक्त देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. महायुतीतील प्रत्येक पक्षाची भूमिका स्वतंत्र आहे. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी कर्जमुक्तीचा मुद्दा घेतलेला नाही,” असे स्पष्ट मत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून महायुती सरकारवर टीका सुरू असताना गायकवाड यांच्या या विधानामुळे महायुतीतील अंतर्गत विरोधाचे संकेत मिळाले आहेत. निवडणुकीपूर्वी महायुतीकडून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागात मतदारांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला समर्थन दिले.

Corona : स्वाईन फ्ल्यूला पोषक वातावरण, आरोग्य विभागाची चिंता वाढली !

मात्र, निवडून आल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘कर्जमाफी शक्य नाही, शेतकऱ्यांनी आपापली कर्जे फेडावी,’ असे विधान केले. यावर वृत्तवाहिनीने आमदार गायकवाड यांना विचारले की, ही शेतकऱ्यांची फसवणूक नाही का?

या प्रश्नावर उत्तर देताना गायकवाड म्हणाले, “शेतकऱ्यांची फसवणूक झाली असे म्हणणे अयोग्य ठरेल. कारण ही कर्जमुक्तीची भूमिका महायुतीची नव्हती, ती फक्त देवेंद्र फडणवीस यांची होती. महायुतीमध्ये तीन वेगळे पक्ष आहेत आणि त्यांची धोरणात्मक भूमिका वेगवेगळी असते. या वर्षासाठी कर्जमाफी शक्य नाही, हे सरकारचे आर्थिक वास्तव आहे.”

गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे कर्जमाफीच्या आश्वासनाची जबाबदारी नेमकी कोणाची होती, यावर नव्याने राजकीय चर्चेला वाव मिळाला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असताना हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

Maha Politics : आमच्या आमदारांच्या भरवशावर ‘ते’ खासदार झाले !

कर्जमाफीचा मुद्दा महायुतीसाठी संवेदनशील ठरू शकतो. विविध घटक पक्षांची परस्पर विरोधी भूमिका समोर येत असतानाच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधक या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेऊ शकतात.