Breaking

Harshawardhan Sapkal : मोदींचं चक्र उलट्या दिशेनं फिरतंय!

 

PM Modi has not fulfilled any of his promises, claims Congress state president : आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनांनी रेकॉर्ड मांडला पाहिजे

Nagpur : नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला ११ वर्ष पुर्ण झाले. या काळातील ताळेबंद आता जुळवला जात आहे. हॅपी इंडेक्सच्या बाता करणारे लोक आता गप्प आहेत. या ११ वर्षाच्या काळात गरीब अधिक गरीब झाला अन् श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेले. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनांनी त्यांचा रेकॉर्ड मांडला पाहिजे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चक्र उलट्या दिशेने फिरत आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट मोदींवर निशाणा साधला.

दोन कोटी नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, स्वामीनाथन आयोग, स्मार्ट सीटी आणि कहर म्हमजे प्रत्येक व्यक्तीच्या खिशात १५ लाख रुपये देऊ, अशी आश्वासने नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये दिली होती. पण आज ११ वर्षांनंतर यातील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. आता अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांनी आता लोकपाल बिलाचे काय झाले, ते सांगावे. पेट्रोल दर कुठवर गेले, हेही सांगावे, असे आव्हान हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

Harshwardhan Sapkal : भाजप म्हणजे नेते खाणारी चेटकीण, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका

शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षांचे एकत्रिकरण आणि उद्धव – राज ठाकरे यांच्या युतीबद्दल विचारले असता, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्यांनी काय निर्णय घ्यावा, हे त्यांनी ठरवायचे आहे. जे आमच्या सोबत येतील, त्यांच्यासोबत आम्ही पुढे जाऊ. संविधान बदलण्याचे काम सुरू आहे. त्याविरोधात आम्हाला लढा द्यायचा आहे, असे सपकाळ म्हणाले.

Local Body Elections : काँग्रेसमध्ये ‘बॅटींग लाईन चेंज’ सपकाळांनी दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते काढले बाहेर !

आज महाराष्ट्रात अनेस समस्या आहेत. शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, पीक कर्ज, कर्ज माफी, बियाणांचा तुटवडा आदी समस्यांवर कुणीही बोलायला तयार नाही. पण बीड प्रकरण, पुणे प्रकरण, दोन भावांची युती, काका पुतण्यांचे एकत्रिकरण असे मुद्दे पुढे करून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जनता हे आता समजू लागली आहे, असे सपकाळ म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात स्थानिक पातळीवर आमचे नेते संघटीतपणे निर्णय घेतील, असे ते म्हणाले.