Breaking

Bachhu Kadu Hunger Strike : तब्येत बिघडली, लेखी आश्वासनानंतर बच्चू कडूंचे आंदोलन थांबवण्यावर होणार ‘मंथन’

Major developments in the protest, Minister Uday Samant to meet : आंदोलनात मोठ्या घडामोडी, मंत्री उदय सामंत घेणार भेट!

Amravati: प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 7 वा दिवस आहे. विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत.
आंदोलन स्थळी मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज मंत्री उदय सामंत हे त्यांची भेट घेणार आहेत. सरकारकडून लेखी आश्वासन आल्यावरच आंदोलन थांबावण्यावर विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाने राज्याचे लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी त्यांनी 8 जूनपासून आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. मोझरी येथील गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीसमोर त्यांचे हे उग्र उपोषण सुरू आहे. काल सरकारच्या वतीने महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली. मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर कार्यकर्त्यांची बाजू ऐकून उपोषण सोडण्याविषयी निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

Iran vs Israel Conflict : इस्रायलला इराणचे हल्ल्याने प्रत्युत्तर, संघर्षात आतापर्यंत काय घडले महत्वाचे 10 मुद्दे!

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळी 200 पेक्षा अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. आंदोलन स्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. त्यांचे कार्यकर्ते पण अनेक ठिकाणी आंदोलन करत आहेत. काल एका कार्यकर्त्याने विषारी औषध प्राशन केले होते. तर काहींनी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. आंदोलन स्थळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी यंत्रणा सतर्क आहे.

मंत्री उदय सामंत बच्चू कडू यांची आज भेट घेणार आहेत. यापूर्वी मंत्री संजय राठोड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास मंगेश चिवटे यांनी सुद्धा बच्चू कडू यांची भेट घेतली होती. दरम्यान शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर अनेक संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनाला राज्यात व्यापक पाठिंबा मिळत आहे. सरकार बच्चू कडू यांच्या मागण्यांविषयी आता ठोस आश्वासन देते की समित्यांचे पालुपद पुढे करत हा मुद्दा काही काळ पुढे ढकलते हे आज समोर येईल.

Local Body Elections : दिलीप सानंदा राष्ट्रवादीत; समर्थक भाजपमध्ये!

मंत्री उदय सामंत हे कोणता प्रस्ताव घेऊन येतात, ते तोडगा काढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहेच. मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. पण अद्याप सरकारकडून कोणतेही लेखी पत्र आलेले नाही ते आल्यावर कार्यकर्त्याशी बोलून आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.