Breaking

Maharashtra’s Farmers : अदानीसाठी नियम बदलता, मग शेतकऱ्यांसाठी नियम व अटी कशाला ?

Nana Patole said if rules are changed for Adani then why rules and conditions for farmers : आश्वासन देताना समिती गठीत करण्याची भाषा नव्हती

Mumbai : या राज्यात अदानीसाठी महायुती भाजप सरकार सर्व नियम बदलते. त्यांना नियमांची ऐसीतैसी करून सर्व सुविधा दिल्या जातात. तर मग शेतकऱ्यांसाठी नियम व अटी कशाला लावले जातात? भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. भाजपच्या धोरणांमुळेच शेतकरी पिचला आहे. निवडणुकीच्या वेळी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले. पण आता मात्र कर्जमाफी देण्यावरून सत्ताधारी पक्षांतील नेते पळ काढत आहेत, असे म्हणत नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

केंद्रात काँग्रेस प्रणित युपीए सरकार असताना डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान होते. त्यांनी ऐतिहासीक अशी ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. महाविकास आघाडी सरकारनेही कोणतेही नियम, अटी न लादता सरसकट कर्जमाफी दिली होती. शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याची दानत काँग्रेसने नेहमीच दाखवली आहे. परंतु भाजप शेतकरी विरोधी आहे. मेघा इंजिनिअरींग कंपनीला तीन हजार कोटी रुपयांचे कंत्राट देताना सरकारकडे पैसे असतात. रस्त्यांसाठी पैशाची काही कमतरता नाही, असे त्यांचे नेते जाहिरपणे सांगतात. पण शेतकऱ्यांना देण्यासाठी मात्र त्यांच्याकडे पैसे नसतात, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

Nana Patole : ‘झुडपी’चा निर्णय गरिबांच्या घरावर उठणार!

राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे. त्याला सरकारच्या मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात, ही लाजीरवाणी बाब आहे. भाजपाचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा गरीब व गरजू असून सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, अशी नाना पटोले यांनी केली आहे.