Shahaji Bapu Patil’s statement creates a stir : शहाजी बापू पाटलांच्या वक्तव्यामुळे खळबळ
Pandhrpur : संजय राऊत यांना पण गुवाहाटीला यायचं होतं पण आमदारांचा त्यांना प्रचंड विरोध होता असा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली, अनेक आमदारांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेत, उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
त्यानंतर प्रकरण न्यायालयात पोचल पण पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळालं. शिवसेनेत दोन गट पडले, शिवसेना ठाकरे आणि शिवसेना शिंदे असे दोन गट तयार झाले.
दरम्यान या घटनेच्या तीन वर्षांनंतर आता शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खा. संजय राऊत यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत यांना गुवाहाटीला यायचे होते, परंतु आमदारांचा विरोध होता, असा दावा त्यांनी केला आहे. तीन वर्षानंतर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे,
Shivsena confict : एक म्हणतो ‘ कम ऑन किल मी’; दुसरा म्हणतो ‘तुला आता कशाला मारायचे?’
या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. गुवाहाटी येथील बंडामध्ये उद्धव ठाकरे यांना सोडून संजय राऊत यांनाही यायचे होते. पण त्यावेळी 30 ते 35 आमदारांनी राऊत यांना विरोध केला. म्हणून राऊत आजही चिडचिड करून वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात. शिवसेना ठाकरे गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य आहे, लवकरच राजकीय घडामोडी घडतील असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.
Shivsena confict : ठाकरेंना ‘जय महराष्ट्र ‘ करत तीन माजी नगरसेवक शिंदेंकडे
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ठाकरे गट एकत्रीकरणाचा विषय पुढे येतोय. पण काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव साहेब यांच्या सोबत राज ठाकरे जर गेले, तर राज साहेबांनी हिंदुत्व सोडले असे म्हणावे लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुंबई महापालिकेत महायुतीचीच सत्ता येणार असं भाकीत देखील त्यांनी यावेळी वर्तवलं आहे.