Maharashtra Jeevan Pradhikaran on back foot after ShivSena’s agitation : पाणी प्रश्न सुटणार; निष्क्रिय प्रशासन, मनमानी कारभारामुळे टंचाई
Akola गेल्या नोव्हेंबर २०२४ पासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या दहीहंडा व परिसरातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. 84 खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत अकोटपर्यंत मुबलक पाणी असतानाही दहीहंडा गाव व खानापूर झोनमधील दोन गावांमध्ये पाणीपुरवठा नियमित न झाल्याने शिवसेनेच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले उपोषण यशस्वी ठरले असून, मजीप्रा विभागाने लेखी आश्वासनाद्वारे दहिहंडा येथील एक वार्ड व खानापूर झोनमधील दोन गावांना दररोज पाणीपुरवठा करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले.
Sushma Andhare : मराठीच्या हितापुढे सगळ्या टीकाटिप्पणी शुल्लक
दहीहंडा परिसरात पाणीटंचाई गंभीर बनली होती. १५ ते २० दिवसांतून एकदा पाणी मिळणे, आणि तोही अत्यल्प दाबाने ही ग्रामस्थांची तक्रार होती. मजीप्रा विभागाकडे वारंवार निवेदने दिल्यानंतरही उपाययोजना न झाल्याने गावकऱ्यांनी शेवटी थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
शिवसेना उपनेते आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे, शहरप्रमुख राहुल कराळे, युवासेना प्रमुख अभय खुमकर, माजी जि.प. सदस्य प्रशांत अढाऊ, माजी नगरसेवक शिवा मोहोड, सरपंच आशिष कासमपुरे, व ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत उपोषणाची ठाम भूमिका घेतली गेली. याच एकतेमुळे प्रशासनास नमते घ्यावे लागले. मजीप्रा अधीक्षक अभियंता संतोष गव्हाणकर आणि कार्यकारी अभियंता आर. के. चौधरी यांनी लेखी स्वरूपात दररोज पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले. यानंतर गावकऱ्यांनी निम्बू सरबत घेवून उपोषण समाप्त केले.
Railway station : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे की महात्मा फुले रेल्वे स्टेशन!
उपोषणस्थळी विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात गजानन पुंडकर, शरद बुंदे, गजानन चराटे, गजानन वानखडे, अमोल गाडे, सुनील भांडे, सुनील पोटे, राजू गोरले, भूषण गुजराथी, संजय आठवले आदींचा समावेश होता. शेकडो गावकऱ्यांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या हलगर्जीविरोधात ठाम भूमिका घेतली.
दहीहंडा परिसरात पाणी असूनही ते मिळण्यासाठी उपोषण करावे लागणे हे दुर्दैवी आहे. प्रशासनाने यापुढे तत्परतेने जनतेच्या समस्या सोडवाव्यात, हीच गावकऱ्यांची अपेक्षा आहे.