Breaking

Rahul Gandhi : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8 टक्के मतदार वाढले!

Rahul Gandhi’s serious allegations; Commission calls for discussion : राहुल गांधींचा गंभीर आरोप; आयोगाने चर्चेसाठी बोलावले

New Delhi : काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप करत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच्या मतदारसंघातील मतदार यादीत अवघ्या 5 महिन्यांत तब्बल 8% वाढ केली असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे. दरम्यान या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांना बोलवल्या आहे अशी माहिती प्राप्त होत आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मतदारसंघातील मतदार यादीत 5 महिन्यांत तब्बल 8% वाढ झाली असा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधींनी समाज मध्यमावर पोस्ट करत हे आरोप केले. तर काही बूथवर 20-50% वाढ झाली आहे. सोबतच अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचेही यात म्हटलं आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत गडबड घोटाळा होत असतानाही निवडणूक आयोग गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Tribal Pardhi : नागपुरात उद्यापासून पारधी न्याय संकल्प परिषद !

पडताळणी केलेल्या पत्त्याशिवाय हजारो मतदारांना उघड केले. असे सर्व सुरू असनाना निवडणूक आयोग गप्प आहे की यात सहभागी आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. शिवाय म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करतोय. असेही राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Vijay Wadettiwar : अबू आझमी आणि भाजप – एका नाण्याच्या दोन बाजू !

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी संदर्भात राहुल गांधी यांनी वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून अशीच टीका केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लेख लिहून उत्तर दिले होते. या प्रकरणात निवडणूक आयोगाने उत्तर देणे अपेक्षित आहे. ते गप्प का आहेत? असा सवाल निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने ही नंतर खुलासा केला. मात्र हा विषय अजून थांबलेला नाही, राहुल गांधी यांच्या पोस्टनंतर आता निवडणूक आयोगाने त्यांना यांच्या आक्षेपाबाबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली असून त्यांना त्यासाठी निमंत्रण दिल्याचे सांगितले जात आहे.