Breaking

Anil Deshmukh : ऐन निवडणुकीच्या तोंडावर येणार त्यांची ‘योग्य वेळ’

 

NCP leader Anil Deshmukh hits out at Chief Minister Devendra Fadnavis : रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ

Nagpur : विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना वचन देऊनही महायुतीने त्यांना अद्याप कर्जमाफी दिलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, ‘शब्द फिरवणार नाही, योग्य वेळी कर्जमाफी देऊ’ यांची योग्य वेळ म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर येणार आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, राज्यात रासायनिक घते, DAP सह अन्य मिश्र खतांचा तुटवडा आहे. पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा झाला नाही. मागणीच्या तुलनेत २० ते ३० टक्केच DAPचा पुरवठा झालेला आहे. परिणामी शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. युरीयाचाही तुटवडा आहेच आणि रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्या आणि त्यानंतरची कामे करावी कशी, हा त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न आहे. आज शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे कर्जमाफीची गरज आज आहे, याकडे सरकारने लक्ष द्यावे आणि खतांच्या किमती कमी कराव्या.

Vijay Wadettiwar : अबू आझमी आणि भाजप – एका नाण्याच्या दोन बाजू !

हिंदी भाषेची सक्ती केल्यामुळे लोकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. सरकारने जो काही निर्णय घेतला, त्यावर पुन्हा विचार केला पाहिजे, असे देशमुख म्हणाले. अबू आझमी यांनी वारकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता, अबू आझमी यांनी अशी वक्तव्ये करणे टाळले पाहिजे, असे ते म्हणाले. भास्कर जाधव यांच्याबाबत म्हणाले की, शरद पवार यांची साथ सोडणारे एकांतात जेव्हा भेटतात, तेव्हा खंत व्यक्त करतात. असे अनेक ज्येष्ठ नेते आहेत. यासंदर्भात जाधव यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तशा भावनाही लोकांनी व्यक्त केल्या आहेत.

Harshvardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ. आषाढी वारीच्या दिंडीत सहभागी होणार

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रमाणे वाढीव अरिअर्सचाही मोठा घोटाळा आहे. ज्या दलालांनी मुख्याध्यापक आणि शिक्षक पदांवर नोकऱ्या लाऊन दिल्या, त्या दलालांवर आधी कारवाई झाली पाहिजे. पण एसआयटी कारवाई करत नाही. नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात हे दलाल आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे अनिल देशमुख म्हणाले.