Breaking

Raju shetti : मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे,हे तर लुटारूंचे टोळके

Oppose to Shaktipeeth highway, criticism from Raju Shetty : शक्तिपीठ महामार्गास पुन्हा विरोध,राजू शेट्टींची टीका

Mumbai: निवडणुकीपूर्वी स्थगिती देण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्ग मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. याचे पडसाद उमटू लागले असून मंत्रिमंडळातीलच मंत्र्यांची या निर्णयाला नापसंती होती असे समोर येत आहे. दरम्यान शेतकरी नेते राजू शेट्टी संतप्त झाले असून मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नाहीत. हे तर लुटारूंचे टोळके आहे अशा शब्दात त्यांनी टीका केली असून शेतकऱ्यांना दगड तयार ठेवा असा संदेश दिला आहे.

विधानसभा निवडणुकांपूर्वी शक्तिपीठ महामार्गास विरोध लक्षात घेता सावध भूमिका घेणाऱ्या महायुती सरकारने अखेर शक्तीपीठ महामार्ग – पवनार ते पत्रादेवी या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मान्यता दिली आहे. राज्यातील साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर, अंबेजोगाई सहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा शक्तिपीठ महामार्ग आहे. बैठकीत या प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी 20 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.

Sharad Pawar : सरकारमध्ये असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये : शरद पवार

 

मात्र, या महामार्गास कोल्हापूर, धाराशिव, सोलापूर येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळेच, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मंत्र्‍यांनी मंत्रिमंडळ बैठकीत शक्तिपीठ महामार्गावरुन नाराजी व्यक्त केली. तर, शेतकरी नेते राजू शेट्टींनीही कडक शब्दात इशारा दिला. शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय होणे अपेक्षित असे त्यांचे मत होते असे सांगण्यात येत आहे.
12 जिल्हे आणि 39 तालुक्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग राज्यासाठी फायदेशीर आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध सरकारला परवडण्याजोगा नाही, अशी भूमिका काही मंत्र्‍यांनी बैठकीत मांडली. मात्र, तरीही सरकार शक्तिपीठ महामार्गाच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती समोर येत आहे.

Harshawardhan Sapkal : वारकरी संप्रदायाने आध्यात्मिक क्रांती घडवली !

 

दरम्यान, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे लुटारूंचे टोळके झाले आहे. शक्तिपीठ महामार्ग म्हणजे 30 हजार कोटींमध्ये होणारा रस्ता 86 हजार कोटीवर नेला आहे. 50 हजार कोटी लुटण्याचा डाव आम्ही शेतकरी हाणून पाडू, अशा शब्दात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला इशारा दिला. तसेच, मोजणी करायला येणाऱ्यांना शेतकरी गोफनीच्या दगडाने धडा शिकवतील, शेतकऱ्यांनो आपली गोफण आणि दगडं तयार ठेवा. कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापी होऊ देणार नाही, असेही राजू शेट्टींनी म्हटले आहे.

Anil Deshmukh : ऐन निवडणुकीच्या तोंडावर येणार त्यांची ‘योग्य वेळ’

शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनास 20 हजार कोटींची तरतूद मंत्रिमंडळाने केल्याच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाचे नेते राजन क्षीरसागर यांनी म्हणले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी या प्रकल्पास मान्यता देणार नाही, महाराष्ट्राला कर्जात बुडवणारा आणि शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या जमिनी कवडीमोल दराने घेण्याचा हा सरकारचा डाव आहे. पण, गोळीबार जरी केला तरी शेतकरी आपल्या जमिनी सोडणार नाही,

cabinet meeting : शक्तिपीठ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शासनाने शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचे जाहीर केले होते. मात्र, विधानसभेतील बहुमतानंतर पुन्हा महामार्गाचे काम सुरू करणे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकार शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करत आहे, शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी दोन वर्षांपासून आमचा संघर्ष सुरू आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी धाराशिव येथील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

___