Samadhan Diwas to resolve grievances in villages : महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या बुधवारी ‘समाधान दिवस’
Nagpur निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या यात्रा निघतात, हे आपल्याला माहिती आहे. मात्र त्यातून मतदारांना आकर्षित करण्याचा उद्देश असतो. मात्र नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. गावांमधील तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ‘समाधान दिवस’ची संकल्पना मांडली आहे.
गावातील लहान-मोठ्या तक्रारींबाबत वर्षानुवर्षे सुरू असलेले वाद सामोपचाराने तत्काळ मार्गी लागावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक महिन्यात तिसऱ्या व चौथ्या बुधवारी जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी समाधान दिवस म्हणून राबविण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत त्यांनी ही घोषणा केली.
Devendra Fadnavis : “झूठ बोले …” राहुलजी, तुम्ही कधीपर्यंत हवेत बाण सोडत राहणार?
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा परिषद व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक महिन्यात तिसऱ्या व चौथ्या बुधवारी प्रत्येक गावासाठी असलेल्या सजाच्या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक व गावपातळीवरील शासकीय कर्मचारी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीचे समाधान करतील. याचबरोबर जे शक्य होणारी कामे आहेत ती तत्काळ मार्गी लावतील.
उत्तम प्रशासनाच्या मापदंडांमध्ये गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक यांची कर्तव्यतत्परता ही अत्यंत महत्त्वाची असते. पाणंद रस्ते, फेरफार, पीककर्ज, संजय गांधी निराधार योजना व इतर निवडक योजना या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व तत्पर झाल्यास नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत. शासनातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्तव्याप्रती गंभीर असलेच पाहिजे.
Raju shetti : मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे,हे तर लुटारूंचे टोळके
तलाठी व ग्रामसेवक यांच्या गावपातळीवर उपस्थितीबाबत लवकरच एक परिपत्रक निर्गमित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विभागाच्या योजनांना अधिक गती देण्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत समाधान दिवस, पाणंद रस्ते, अतिक्रमण मुक्त करणे, फेरफार अदालत व जिवंत सातबारा मोहीम, ॲग्री स्टॅक, पीककर्ज याबाबत उपस्थित तलाठ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.