Shiv Sena alleges 50 percent scam in Fadnavis’ dream project Samruddhi Highway : सर्व पैसा आमदार – खासदार विकत घेण्यासाठी वापरला
Mumbai : नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. हा कसा असला पाहिजे, याबद्दल ज्याचे-त्याचे आपापले विचार आहेत. पण १९ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इगतपुरी ते आमने या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन केले. आज त्या रस्त्याची अवस्था कुणीही जाऊन बघावी, म्हणजे यामध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे, हे सहज लक्षात येईल, असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना महायुती सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, फडणवीसांच्या या ड्रिम प्रोजेक्टमध्ये ५० टक्के घोटाळा झालेला आहे आणि हा पैसा शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या पक्षांचे आमदार-खासदार विकत घेण्यासाठी वापरण्यात आला आहे. हा सर्व पैसा ठेकेदारांनी या लोकांना पुरवला आहे. असे मोठमोठे घोटाळे करून सरकार बनवले जात आहेत.
Medha Kulkarni : ‘ एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव..’, मेधा कुलकर्णी यांच्यावर प्रहार
आता हे लोक शक्तिपीठ महामार्ग बनवण्याच्या मागे लागलेले आहेत. त्यासाठी २० हजार कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. यातले किमान १० हजार कोटी रुपये बाहेर येतील, जसे एमएमआरडीएमधील तीन हजार कोटी रुपये आले. हे १० हजार कोटी रुपये ठेकेदारांकडून घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरले जातील, हे मी दाव्याने सांगतो, असे राऊत म्हणाले. हे ड्रिम प्रोजेक्टे्स ठेकेदारांकडून हजारो कोटी रुपये घेण्यासाठी राबवले जात आहेत. या ड्रिम प्रोजेक्ट्सचा महाराष्ट्राला किती फायदा आहे अन् किती नाही, हा नंतरचा प्रश्न आहे. पण आपले खिसे भरा अन् असल्या पद्धतीचे राजकारण करा, हा एकमेव धंदा सुरू आहे, असाही आरोप त्यांनी केला.
Vidarbha farmers : सरकार कर्जमाफी देईना, बँकेतून नवीन कर्ज मिळेना!
समृद्धी महामार्गाच्या दुर्दशेसाठी केवळ ठेकेदारांना जबाबदार धरून चालणार नाही, तर संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढले पाहिजे. कारण यामध्ये सर्व कमिशनबाजी झाली आहे. ५०० कोटी माळेगाव कारखान्याला देणार आहेत, ते कोठून देणार आहेत, असा सवाल करत महाराष्ट्राची लूट सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या ज्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि घोटाळे होत आहेत, त्या घोटाळ्यांची तुलना जगातील कोणत्याही घोटाळ्यासोबत होऊ शकणार नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.