Actor opposes Government decision : नाना पाटेकर, प्रशांत दामले अन् मराठी क्रिकेटपटू गेले कुठे ?
Nagpur : राज्यातील महायुती सरकारने मराठी जनतेला गाफील ठेऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांवर हिंदी भाषेची सक्ती लादली आहे. त्यामुळे राज्यभरातून या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय नेते, मराठी भाषा अभ्यासक हिंदीच्या सक्तीला विरोध करत आहेत. पण यामध्ये मराठी कलावंत आणि क्रिकेटपटू बॅकफूटवर दिसत आहेत. अशात ज्येष्ठ मराठी कलावंत सयाजी शिंदे हिंदी सक्तीचा विरोध करत फ्रंटफूट आले आहेत. त्यांनी या सक्तीला तीव्र विरोध केला आहे.
एरवी मराठी बाणा जोपासणारे मराठी कलावंत नाना पाटेकर, प्रशांत दामले आणि मराठी क्रिकेटपटू आता कुठे गेले, असा सवाल शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केला. त्यानंतर सयाजी शिंदे हिंदी सक्तीच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, चिमुकल्या मुलांवर तीन तीन भाषांची सक्ती का? त्यातही हिंदी भाषाच का पुढे केली जात आहे? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे.
Axiom Mission : शुभांशु शुक्ला यांनी रचला इतिहास, अंतराळात रवाना
खरा बदल घडवण्याचा मार्ग म्हणजे मराठी भाषेतून शिकवणे होय. हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणे योग्य नाही. ही सक्ती म्हणजे असंवेदनशील आहे. आज मी जो काही आहे, तो माझ्या मायमराठी भाषेमुळेच आहे, असे सयाजी म्हणाले. लहानपणीच मातृभाषा सोडून दुसरी भाषा शिकण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. आपल्या मुलांना आधी मराठी तर नीट शिकू द्या. नंतर त्यांनी किती आणि कोणत्या भाषा शिकायच्या, त्यांचं ते ठरवतील. देशातील प्रत्येक राज्यात त्यांच्या-त्यांच्या भाषेला महत्व दिलं गेलं पाहिजे. महाराष्ट्रात मराठीला महत्व द्यायला हवं. त्यामुळे सरकारने हे धोरण मागे घ्यावे, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे.