Voter turnout also increased in West and North Nagpur, where Congress won : भाजप आमदार संदीप जोशींचा पलटवार; दोन्ही ठिकाणी ७ टक्के मतदार वाढले
Nagpur पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी झाले, जिथे ७% मतदारवाढ झाली. उत्तर नागपूरमध्ये काँग्रेसचे नितीन राऊत विजयी झाले, तिथेही ७ % वाढ झाली. तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले, तेव्हा ईव्हीएममध्ये घोटाळ्याची चर्चा होत नाही. पण भाजप जिंकल्यास लगेच लोकशाही धोक्यात असल्याच्या बाता सुरू होतात, या शब्दांत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत ८ टक्क्यांनी मतदार वाढले, काही बुथवर ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली, असा आरोप राहुल गांधी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांचे आरोप खोटारडे व दिशाभूल करणारे आहेत. एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगितली, की ती लोकांना खरी वाटू लागते. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या याच गोबेल्स नीतीचा अवलंब करत असल्याची टीका त्यांनी केली.
Sea plane : नागपूर जिल्ह्यात चार ठिकाणी ठिकाणी सुरू होणार सी प्लेन !
राहुल गांधी यांचा आरोप केवळ फडणविसांच्या विरोधात नव्हे, तर संपूर्ण राज्यातील निवडणूक यंत्रणेवरच शंका घेणारा आहे. २५ पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघांत लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान ८ टक्क्यांहून अधिक मतदारवाढ झाली आहे. विशेष म्हणजे, यातील बरेच उमेदवार काँग्रेस किंवा त्यांच्या सहयोगी पक्षांचे आहेत. लोकसभा निवडणुकीत जागा कमी झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बुथ बळकटीकरणावर भर दिला, असंही संदीप जोशी म्हणाले.
Local Body elections : ‘भाऊ’, ‘भाई’ अन् ‘दादां’नी कसली कंबर !
मतदार नोंदणी मोहिमा, जनजागृती अभियान राबवण्यात आले. शिवाय, लोकसभा निवडणूक उन्हाळ्यात पार पडली, तर विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये झाली, त्यामुळे मतदानाच्या आकड्यात फरक पडणे साहजिक असल्याचा दावा जोशी यांनी केला. राहुल गांधी व काँग्रेस दरवेळी आपले अपयश झाकण्यासाठी खोट्या आरोळ्या उठवतात. जनतेचा विश्वास संपादन करण्याऐवजी खोटा प्रचार करण्याची काँग्रेसची सवय झाली आहे असे जोशी म्हणाले.