Ravindra Chavhan : काँग्रेसच्या प्रदेश सचिवासह शेकडो भाजपमध्ये

Hundreds of people, including the Congress state secretary, join BJP : धाराशिव, अमरावती, रायगडमधील विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचेही प्रवेश

Mumbai धाराशिव जिल्ह्यातील उमरगा,लोहारा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार व प्रदेश काँग्रेस सचिव दिलीप भालेराव, जिल्हा काँग्रेस समितीचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे यांनी शेकडो समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. वसई – विरार येथील उबाठा गट तसेच बविआ च्या माजी जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक आणि पदाधिका-यांनीही तसेच रायगड, अमरावती जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ नेते आ. प्रकाश भारसाकळे, आ. स्नेहा पंडीत – दुबे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, माजी मंत्री व लातुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

Local Body Elections : जिल्हा परिषदेच्या तीन गटांच्या प्रभाग रचनेत बदल; विभागीय आयुक्तांचा आदेश

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे 10 माजी सदस्य, 11 माजी सभापती, सहा माजी नगराध्यक्ष, एक बाजार समिती सभापती, बाजार समितीचे 13 संचालक, पाच माजी उपनगराध्यक्ष, पाच माजी उपसभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोन संचालकांनी तसेच 15 नगरसेवकांनी ही भाजपामध्ये प्रवेश केला.

अमरावती अंजनगाव सुर्जी च्या गौरव नेमाडे, निलेश आवंडकर,आकाश येऊल,उमेश दातीर यांसह अनेकांनी ही भाजपामध्ये प्रवेश केला. दक्षिण रायगडच्या श्री. बापूसाहेब सोनगीरेंसह अनेकांनीही पक्षप्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली देश आणि राज्याची दमदार वाटचाल सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वांवर विश्वास ठेवून आणि भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांनी प्रेरित होऊन या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

MSRTC : ‘एसटी’तील रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा!

भाजपा मध्ये सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल आणि या परिसरातील कामे मार्गी लावण्यासाठी पक्ष तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. यावेळी बसवराज पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यात भाजपाला 100 टक्के यश मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त केला.