Historic decision of the International Criminal Tribunal : आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचा ऐतिहासिक निर्णय
New Delhi : बांगलादेशच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2024 मध्ये उफाळलेल्या हिंसक आंदोलनांदरम्यान नागरिकांवर करण्यात आलेल्या गोळीबार, हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणात हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला. या निकालामुळे दक्षिण आशियात अभूतपूर्व खळबळ उडाली आहे.
2024 मध्ये बांगलादेशात विद्यार्थी आणि नागरिकांनी सरकारविरोधात उग्र आंदोलन छेडले होते. या आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचारात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. या सर्व घटनांबाबत आदेश देण्याचा आरोप तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्यावर हत्या, षडयंत्र, मानवतेविरुद्ध गुन्हे आणि राजकीय दडपशाहीचे गंभीर आरोप करण्यात आले होते.
Raj Thackeray Emotional Post : बाळासाहेब स्मृतीदिनी राज ठाकरेंची भावनिक पोस्ट
हिंसाचारानंतर देशभरात अराजकता पसरली आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अखेर शेख हसीना यांनी देश सोडला. त्या सध्या भारतात वास्तव्यास आहेत आणि त्यांची अनुपस्थिती असतानाही खटला सुरू ठेवण्यात आला.
बांगलादेशच्या ICT-1 कोर्टातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने 453 पानी निर्णय जाहीर करत हसीनांना दोषी ठरवलं. न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तजा मजूमदार यांनी निर्णय सहा भागांमध्ये वाचून दाखवला. राष्ट्रभरात या सुनावणीचं टेलिव्हिजनवर थेट प्रसारण करण्यात आलं.
Local Body Elections : काँग्रेसला मोठा धक्का; प्रदेश काँग्रेसचे सचिव राजाभाऊ तिडके भाजपमध्ये !
अभियोग पक्षाने कोर्टात दावा केला की, आंदोलनादरम्यान कारभार चिरडण्यासाठी हसीनांनी यंत्रणेला कठोर आदेश दिले आणि या आदेशांमुळे 1,400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना “1,400 वेळा फाशीची शिक्षा मिळायला हवी” अशी मागणीही अभियोजनाने केली होती.
शेख हसीना यांनी या सर्व आरोपांना राजकीय हेतूने छळ करणारा कट असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं होतं की आंदोलनादरम्यान त्यांनी कधीही हिंसक आदेश दिले नाहीत आणि हे आरोप पूर्णपणे बनावट आहेत.
Dr. Mohan Bhagwat : संघ स्वयंसेवकांच्या भावनिक शक्तीवर चालतो !
त्यांच्या समर्थकांचा दावा आहे की देशातील सत्तांतरानंतर नवीन सरकारने राजकीय सूड म्हणून ही कारवाई केली.
2024 मधील हिंसाचारानंतर देशात मोठी उलथापालथ झाली आणि अखेर शांतता व स्थैर्यासाठी मोहम्मद युनूस यांचं तात्पुरतं राष्ट्रीय सरकार स्थापन करण्यात आलं. आता ICT कोर्टाच्या या निर्णयामुळे बांगलादेशातील राजकीय समीकरणं आणखी अस्थिर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
________








