व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Tukaram mundhe : राज्य प्रशासनात मोठे फेरबदल; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

Tukaram mundhe : राज्य प्रशासनात मोठे फेरबदल; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

maharashtra-bureaucracy-reshuffle-tukaram-mundhe-transfer-devendra-fadnavis : आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी

Mumbai : राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत मोठे बदल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन संपताच करण्यात आलेल्या या फेरबदलांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर नवे चेहरे दिसून येत आहेत.

दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना धडाडीच्या कारवाईमुळे चर्चेत राहिलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागातील बोगस संस्थांवर कारवाई करून त्यांनी त्या विभागात मोठे बदल घडवून आणले होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिवपदी लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. तर अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामुळे मुंबईतील प्रशासनिक कामकाजाला नवे नेतृत्व मिळणार आहे.

Krupal tumane : शिंदेसेनेने तुमाने यांचा नागपूर-रामटेकशी ‘संपर्क’ तोडला; संजय निरुपम नागपूरचे संपर्कप्रमुख

या फेरबदलांत विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विनिता वैद सिंघल यांची मृद व जलसंधारण विभागात बदली करण्यात आली आहे. परिमल सिंग यांची सचिव (कृषी) म्हणून नियुक्ती झाली आहे.

याशिवाय लहू माळी यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड म्हणून, माणिक गुरसाल यांची सचिव, दिव्यांग कल्याण विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. प्रेरणा देशभ्रतार यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई म्हणून बदली झाली आहे.

तसेच पृथ्वीराज बी. पी. यांची वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून यापूर्वी ते पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.

Lonar taluka general meeting : कामे प्रलंबित राहिली तर याद राखा, आमदारांनी अधिकाऱ्यांना खडसावले

एकूणच, या मोठ्या प्रशासकीय फेरबदलांमुळे राज्यातील विविध विभागांमध्ये कार्यक्षमतेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात या बदलांचा प्रशासनाच्या कामकाजावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!