व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Eknath shinde : शिंदेंच्या शिवसेनेत लवकरच मोठ्या फेरबदलाची शक्यता !

Eknath shinde : शिंदेंच्या शिवसेनेत लवकरच मोठ्या फेरबदलाची शक्यता !

eknath-shinde-shivsena-restructuring-performance-review-maharashtra-politics : संघटनात्मक निर्णय; कामगिरी नसलेल्यांना पदावरून हटवण्याचे संकेत

Mumbai: महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत असून उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. पक्षात केवळ पद घेऊन निष्क्रिय राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हटवण्यात येणार असून काम करणाऱ्यांनाच पुढे संधी दिली जाईल, असे स्पष्ट निर्देश शिंदे यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

याच पार्श्वभूमीवर नुकतीच पुण्यात शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. या निर्णयातून राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश देण्यात आल्याचे मानले जात आहे. मंत्री, आमदार, खासदार, संपर्क प्रमुख, विभाग प्रमुख तसेच महिला आघाडी आणि स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा स्वतः एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत सक्रिय भूमिका न बजावणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काळात निवडणुका तातडीने नसल्यामुळे शिंदे यांचे संपूर्ण लक्ष संघटना विस्तारावर केंद्रित आहे. राज्यातील सर्व ४३ हजार गावांपर्यंत शिवसेना पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून प्रत्येक स्तरावर कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पक्षात केवळ संख्येला महत्त्व न देता गुणवत्तेला प्राधान्य दिले जाईल, तसेच फक्त निधीसाठी पक्षात येणाऱ्यांना दूर केले जाईल, असे संकेतही देण्यात आले आहेत.

Mahayuti government : महायुती सरकारचा विकास फक्त कागदावर? ९६,४०० कोटींची थकबाकी न दिल्याने कंत्राटदारांचा ‘एल्गार’; आजपासून राज्यभर ‘काम बंद’!

दरम्यान, संपर्क प्रमुखांच्या नव्या यादीत अनेक आमदार आणि खासदारांना अतिरिक्त जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यांना त्यांच्या मतदारसंघासोबतच संबंधित जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. त्यांच्या कामगिरीचे अहवाल वरिष्ठांकडे सादर करावे लागणार असून त्यावरून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.

पक्षाच्या कामकाजात शिस्त आणि नियोजन आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष या पक्षाच्या कार्यपद्धतीचा आदर्श ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणुका नसतानाही मतदार यादीवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे. आगामी काळात मतदारसंघ पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटनात्मकदृष्ट्या सज्ज राहावी, यासाठी ही तयारी सुरू असल्याचे समजते.

Tension in Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर, पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद

अलीकडे झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालानंतर पक्षातील काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः दोन मंत्र्यांच्या कामकाजावर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अपेक्षित यश न मिळाल्यामुळे ही नाराजी वाढल्याचे मानले जाते.

नागपूर अधिवेशनाच्या काळातच फेरबदलाचे संकेत देण्यात आले होते, मात्र त्यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. आता मात्र संघटनात्मक मजबुतीवर भर देत लवकरच मोठे बदल घडण्याची शक्यता असून, शिवसेनेत आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

error: Content is protected !!