व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ncp crisis : राष्ट्रवादीत अंतर्गत खदखद; संवादाच्या अभावामुळे असंतोष वाढल्याचा दावा

Ncp crisis : राष्ट्रवादीत अंतर्गत खदखद; संवादाच्या अभावामुळे असंतोष वाढल्याचा दावा

ncp-internal-crisis-brijmohan-srivastava-on-sunetra-pawar-leadership-selection-and-lack-of-communication : सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर नाही आक्षेप, पण निवड प्रक्रियेवर प्रश्न

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वबदलानंतर निर्माण झालेल्या अंतर्गत परिस्थितीवरून पक्षातील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर पक्षातील संघटनात्मक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी संवादाच्या अभावामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचा दावा केला आहे.

ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितले की, सच्चिदानंद सिंह यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही. पक्षात संवादाची प्रभावी व्यवस्था नसल्यामुळे संबंधित प्रश्नांचे समाधान होऊ शकले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या मते, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला वैयक्तिक पातळीवर विरोध नाही. मात्र, पक्षाच्या संविधानानुसार राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होणे आवश्यक असल्याची भूमिका सच्चिदानंद सिंह यांनी घेतली असून ती प्रक्रियात्मक मागणी असल्याचे श्रीवास्तव यांनी नमूद केले. पक्षाची अंतर्गत लोकशाही आणि संविधानिक प्रक्रिया कायम राहणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

Vijay wadettiwar, Pratibha dhanorkar : वडेट्टीवारांकडे ११ तर धानोरकरांकडे १६ नगरसेवक; चंद्रपूर काँग्रेसचा गटनेता कोणाचा होणार? विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठी पोकळी निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला. अजित पवार पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांशी सातत्याने संवाद साधत असत. त्यांच्या अनुपस्थितीत तो समन्वय कमी झाल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले असून त्याचा परिणाम पक्षाच्या कार्यपद्धतीवर होत असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.

त्यांनी पुढे म्हटले की, पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या समस्या मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ शोधत आहेत. मात्र, संवादाचा अभाव असल्यामुळे त्यांचे प्रश्न वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे संघटनेत अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यातही अधिक प्रभावी समन्वयाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, पक्षाच्या कार्यकारिणीत नव्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली असली तरी संघटना प्रभावीपणे चालवण्यासाठी सातत्यपूर्ण संवाद, समन्वय आणि निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक असते. या बाबींमध्ये सुधारणा झाल्यास पक्षातील असंतोष कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हटले.

Vijay wadettiwar: राजकीय हित साध्य, आता लाडक्या बहिणींना विसरले! तब्बल ९२ लाख महिला योजनेतून बाद; विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर बोचरा वार

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व, संघटनात्मक प्रक्रिया आणि अंतर्गत संवाद या मुद्द्यांवर चर्चा सुरू असून, आगामी काळात पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व या प्रश्नांवर कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!