Breaking

Mahayuti Government : पेपरलेस प्रक्रिया ठरणार रुग्णांसाठी वरदान!

 

A paperless process will be a boon for patients : गंभीर आजारांवर आर्थिक साहाय्य

Wardha गेल्या काही वर्षांपासून राज्यात मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष सुरू आहे. या कक्षाच्या माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना मदत दिली जाते. दरम्यान, आता महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष सुरू केला जाणार असल्याने दिरंगाई टळणार आहे. गंभीर आजारावरील उपचारांसाठी आर्थिक मदत लवकर मिळणार आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी राज्यभरातून अर्ज दाखल होत असतात. मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षा’कडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना संबंधित रुग्णालयामार्फत आर्थिक साहाय्य देण्यात येते.

MSRTC : वर्ध्यात दाखल होणार ५३ इलेक्ट्रिक बसेस

 

११ रुग्णालये जिल्ह्याच्या शहरी भागात आहेत. यामध्ये एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा व आठ ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. शिवाय संस्थेची दोन मोठी रुग्णालये आहेत.

आर्थिक साहाय्य देण्याकरिता मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जांचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. आता जिल्ह्यातच कक्ष होणार असल्याने मंत्रालयात येण्याची गरज नसणार आहे. आजवर या योजनेतून जिल्ह्यातील अनेक रुग्णांना उपचारासाठी मदत मिळाली आहे.

PDKV Akola : ४ हजार ४० स्नातकांना होणार पदवी प्रदान!

 

मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून अनेक रुग्णांना मदत होत असते. यामुळे आता लोकांना लगेच मदत मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’ कक्ष सुरू करण्यात येणार आहे. याबाबत आता २२ जानेवारी रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती जिल्ह्यात मिळणार आहे. यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांचा त्रास कमी होणार आहे. कुटुंबीयांचा पैसा, जास्तीचा वेळ वाचणार आहे