Wadettiwar claims, the fight between Fadnavis and Shinde may be Fake : लाडकी बहीण आणि शेतकर्यांचे कर्ज यांतून पळ काढण्यासाठी हे खोटे-खोटे भांडण असावे
Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाद होत असल्याची स्थिती दिसते आहे. पण हे भांडण खरे असेल असे वाटत नाही. तर लाडक्या बहीणींना द्यायचे असलेले पैसे, शेतकर्यांचे कर्ज यांसारख्या प्रश्नातून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे खोटे-खोटे भांडण असावे, अशी शंका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
आज (२० फेब्रुवारी) नागपुरात वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना ‘भांडा सौख्य भरे..’ असा आशीर्वाद त्यांनी दिला. मूलभूत प्रश्नांपासून महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे भांडण तर नाही ना, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Vijay Wadettiwar : सरकारसाठी लाडकी बहीण म्हणजे ‘गरज सरो अन् वैद्य मरो’
आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याची कल्पना चांगली आहे. पण याचंही अरबी समुद्रातील स्मारकासारखं होऊ नये. अरबी समुद्रातील स्मारक प्रत्यक्षात यावे, कृतीत घडावं, अशी अपेक्षा करतो. कारण महाराजांच्या 355व्या जयंतीनिमित्त केलेली घोषणा आहे. तसे झाले नाही तर महाराष्ट्रात महाराजांचा अपमान करणारे देवेंद्र फडणवीस असतील.
सरकारमध्ये प्रत्येक बाबीत एकमेकांवर कुरघोडी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा नारा दिला. मात्र ती स्वच्छता कुठून करतात, यावर लक्ष ठेवावे लागेल. स्वच्छता ठेवतात, स्वच्छ करतात की साफ करतात. याचेही अर्थ वेगवेगळे आहेत. एकनाथ शिंदेंपासून याची सुरुवात कदाचित झाली असावी. त्यांच्यात मतभेद, मनभेद सुरू आहेत. हा संपूर्ण प्रकार किळसवाणा आहे.
Congress leader on Sahasram Korote : काँग्रेसशी गद्दारी करणारे भटकतच राहणार
अंजली दमानिया पुरावे असल्याशिवाय बोलत नाही, असा आमचा समज आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी अपेक्षा आहे. बीएमसीच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. आता हे विभाग शिंदेंकडे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री निविदा काढतात आणि आज ते उपमुख्यमंत्री आहेत. यावरून काय ते समजावं. ‘तुझं माझं जमेना, तुझ्या विना करमेना..’ अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे, असल्याचा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
नितेश राणे यांना महाराष्ट्राचे योगी व्हायचे आहे. महाराष्ट्रातला योगी होण्यासाठी ज्या गोष्टी घडत नाही. त्यावर ते बोलत असतात. त्यामुळे नितेश राणेंच्या अशा वक्तव्यांना फार काही महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.