Breaking

Sidhharth Kharat : आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घेणार आहात?

 

MLA aggressive on Farmer suicide : आमदार खरात यांचा सवाल; कैलास नागरे यांच्या कुटुंबांना मदत करा

Buldhana राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरीच ‘शेती आहुती मागतेय’ असे पत्र लिहून जीवन संपवत असेल. तर राज्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, हे शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येवरुन अधोरेखित होते. कैलास नागरे यांची ही आत्महत्या नसून सरकारी व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट बघणार आहात, असा संतप्त सवाल मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केला आहे.

युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी , अशी मागणीही आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली आहे. शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांना सिद्धार्थ खरात यांनी सांत्वनपर भेट दिली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

उच्चशिक्षित कैलास नागरे यांना शेतीची अत्यंत ओढ होती. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेती नफ्यात कशी येईल यासाठी कायम ते प्रयत्नशील असायचे. त्यांचं अख्ख कुटुंब शेतामध्ये राबराब राबायचं. नुकतीच कैलास यांनी आपल्या शेतामध्ये खरबूज पिकाची लागवड केली होती. परंतु शिवणी आरमाळच्या धरणामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे उभ पीक शेतामध्ये पाण्याअभावी सुकायाला लागले होते, असं नागरे म्हणाले.

Devendra Fadnavis Politics : विधानसभेत थांबवले, परिषदेत सावरले!

अशा विदारक परिस्थितीत कवी मनाचा संवेदनशील कैलास यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. कैलास यांनी केलेली आत्महत्या ही आत्महत्या नसून ही या व्यवस्थेने केलेली हत्याचं असल्याची टीका आमदार खरात यांनी केली.

Sandip Joshi’s name for Legislative Council : संदीप जोशी म्हणत असतील ‘तेरे जैसा यार कहाँ’!

सामाजिक जाणीव असलेले कैलास वेगवेगळे आंदोलन करून सामाजिक प्रश्न हाताळायचे. त्यामध्ये त्यांनी खडकपूर्णा धरणाचे पाणी अंचरवाडी फाट्यावरून जाणाऱ्या कालव्यातून अंढेरा येथील रामेश्वर धरणामध्ये सोडावे. नैसर्गिकरित्या प्रवाह असलेल्या नदीच्या प्रवाहातून शासनाच्या तिजोरीवर कुठलाही भार न पडता शिवणी आरमाळ धरणामध्ये हे पाणी सोडावं. अंढेरा आणि शिवणी आरमाळ या परिसरातील बऱ्याच गावाचा पाणी प्रश्न सोडवावा त्यासाठी त्यांनी उपोषण सुद्धा केले. शासन दरबारी अनेक निवेदने दिली. परंतु कैलास यांच्या मागणीला गांभीर्याने घेतल्या गेले नाही. परिणामी त्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप त्यांनी केला