Sudhir Mungantiwar : दिलेला शब्द मुनगंटीवारांनी काही तासांतच केला पूर्ण !

Mungantiwar Keeps His Promise Mul Finally Included in the Special Package of Maharashtra Government : पुराने बाधित आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मिळणार दिलासादायक सवलती

Chandrapur : राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची संवेदनशीलता आणि कार्यतत्परतेमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या मुल तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द काही तासांतच पूर्ण करून दाखवला आणि शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखीत झाली.

अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी निघालेल्या शासनाच्या आदेशात मुल तालुक्याचा समावेश नव्हता. ही बाब लक्षात येताच आमदार मुनगंटीवार यांनी तात्काळ हालचाली केल्या. शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर केवळ काही तासांतच शासनाने सुधारणा करून काल (१० ऑक्टोबर) नवीन शासनादेश काढून मुल तालुक्याचाही समावेश केला आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिलेला शब्द पाळला, रेल्वे उड्डाण पुलासाठी ३१ कोटी मंजूर !

मुल, पोंभूर्णा, बल्लारपूर चंद्रपूर तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या विशेष मदतीच्या पॅकेजचा थेट लाभ मिळणार आहे. राज्य शासनाने जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत. शासन आदेशानुसार जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला एक वर्षाची स्थगिती, वीज बिलात तिमाही माफी तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व शैक्षणिक फी माफी अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी दिले ‘ईरई’च्या सर्वेक्षणाचे निर्देश !

शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यासोबतच खरीप हंगाम जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरींचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घरांची पडझड, घरातील साहित्याचे नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. यासाठी शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

Sudhir Mungantiwar : आ.सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे चिमुकल्या वैष्णवीला मिळाले नवे जीवन

राज्याच्या ३१ जिल्ह्यांतील २५३ तालुक्यांप्रमाणेच आता मुल तालुकादेखील आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. शासन आदेशात स्पष्ट नमूद केल्याप्रमाणे या सवलतींचा थेट लाभ चंद्रपूर जिल्ह्यासोबतच मुल तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार आहे. ही सकारात्मक घडामोड म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत झटत राहणे हीच त्यांची कार्यसंस्कृती असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निर्णयाबद्दल शेतकरी बांधवांकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.