Breaking

Women and Child Welfare Department : गोंदिया जिल्ह्यात तीन महिन्यांत रोखले पाच बालविवाह

 

Five child marriages prevented in three months : महिला व बालकल्याण विभागाची कामगिरी; अक्षय्य तृतीयेला बाळगणार सावधगिरी

Gondia भारतीय परंपरेत विवाह हा एक पवित्र आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा विधी मानला जातो. विशेषतः अक्षय्य तृतीया या शुभमुहूर्तावर मोठ्या प्रमाणात विवाह समारंभांचे आयोजन होते. मात्र, या शुभमुहूर्ताचा काही ठिकाणी गैरवापर होत आहे. अल्पवयीन मुला-मुलींच्या विवाहाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाने मोठी जबाबदारी पार पाडत, गेल्या तीन महिन्यांत तब्बल पाच बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे.

बालविवाह ही फक्त एक सामाजिक समस्या नसून ती मुला-मुलींच्या आयुष्याला कलंकित करणारी गंभीर गुंतागुंत आहे. शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकास या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे महिला व बालकल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून बालविवाह रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. गावाचे सरपंच या समितीचे अध्यक्ष आहेत. पोलिस पाटील सदस्य म्हणून कार्यरत आहेत. संबंधित अंगणवाडी सेविका या सचिव म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. ही समिती विवाहाची माहिती मिळताच तत्काळ कारवाई करून बालविवाह रोखण्याचे कार्य करत आहे.

MLC Dhiraj Lingade : शिक्षणव्यवस्था उध्वस्त करण्याचा सरकारचा कट

 

भारत सरकारने बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलीचे १८ वर्षांपूर्वी आणि मुलाचे २१ वर्षांपूर्वी विवाह लावणे कायद्याने गुन्हा ठरवले आहे. अशा विवाहात सहभागी होणाऱ्यांना दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरी किंवा एक लाख रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते, असे जिल्हा संरक्षण अधिकारी रवींद्र टेंभूर्णे यांनी सांगितले.

Prahar janshakti party : ३९ लाख ९ हजार रुपये वेतन थकले; थाळी वाजवून नोंदवला निषेध

नागरिकांनीही घ्यावी जबाबदारी
बालविवाह रोखण्यासाठी केवळ प्रशासन नव्हे, तर प्रत्येक सुजाण नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. विवाह समारंभाची माहिती मिळाल्यास त्वरित ग्राम समिती किंवा पोलिसांना कळवावे.

बालविवाह ही केवळ परंपरेच्या नावाखाली चालणारी प्रथा नसून ती बालकांच्या भविष्यावर गदा आणणारी एक सामाजिक विटंबना आहे. त्यामुळे अशा प्रथांना थारा न देता, समाज म्हणून आपली भूमिका स्पष्ट आणि ठाम असली पाहिजे.